अटल बिहारी वाजपेयी : संसद मंदिरातील दीपस्तंभ
अटल बिहारी वाजपेयी :
संसद मंदिरातील दीपस्तंभ
ग्वाल्हेरच्या
एका उपनगरातील शाळा मास्तराचा मुलगा म्हणून कारकिर्दीला प्रारंभ करणारे वाजपेयी
आर्य समाजाचे सदस्य झाले,
संघाचे पूर्णवेळ
कार्यकर्ते बनले जनसंघाचे नेते बनले, खासदार बनले,
भाजपचे संस्थापक
बनले,
संसदेत विरोधी
पक्षनेते बनले,
आणि पाच वर्षाची
कारकीर्द पूर्ण करणारे पहिले काँग्रेसेतर पक्षाचे पंतप्रधान बनले. हे स्थान मिळवून २०१५ मध्ये भारतरत्न वाजपेयींनी हिंदुस्थानच्या इतिहासाचं नव तेजस्वी पान लिहिलं. ग्वाल्हेर मधील प्राथमिक शाळेतील
शिक्षकाच्या मुलाच्या दृष्टीनं हे काही सोपं काम नव्हतं. देशातील अत्यंत लोकप्रिय पंतप्रधानांपैकी ते एक बनले ! २००९ साली आजारानं कमजोर झाले; पण त्यापूर्वीची पन्नास वर्षे ते त्यांच्या पक्षाच्या अत्यंत उच्च
वर्तुळातील महत्वपूर्ण हस्ती होते. नेमकी धोरणात्मक उद्धिष्ट असलेला आणि सीमित
लोकप्रियता लाभलेला लहानसा हिंदुत्ववादी पक्ष त्यांनी प्रयत्नपूर्वक विकास घडवून
आज भारताच्या संसदेतील सर्वात मोठ्या पक्षाच्या स्थानी नेऊन पोहोचवला आहे. वाजपेयी ब्रम्हचारी होते ....त्यांना कवितेच आणि खानपानाच वेड ! भारतीय जनता पक्षाचा उगम
ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून झाला त्या संघाची उद्दिष्ट अधिकच कडवी
होती,
वाजपेयी प्रचारक
असले तरी त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी आणि पारंपरिक विचारांच्या
उच्च वर्तुळात त्यांचं वेगळेपण नेहमीच उठून दिसायचं.
१९४२ च्या
महात्मा गांधींच्या भारत छोडो चळवळीनंतर ब्रिटिश हिंदुस्थान सोडून जातील अशी आशा
बाळगणारे वाजपेयी त्या काळाच्या अन्य महाविद्यालयीन युवकांप्रमाणे हा गांधींचा
प्रयत्न संपला असे समजून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकृष्ट झाले. शाळेत असताना
त्यांनी रचलेला एक पोवाडा आता संघाच्या अनेक शाखांमध्ये गायला जातो, "हिंदू तनमन,हिंदू जीवन,रग रग मेरा हिंदू परिचय"
१९२५ साली
डॉक्टर हेगडेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. त्यावेळी
बाबासाहेब आपटे हे देशभर प्रवास करून नवे स्वयंसेवक शोधण्यात मग्न असत. त्यावेळी
आपटे यांचा खूपच त्यांच्यावर प्रभाव पडू लागला होता. वाजपेयींनी संघाच्या कार्यात
पूर्णपणे बुडून गेल्यानंतर ते हिंदी मासिक राष्ट्रधर्म, हिंदी साप्ताहिक पांचजन्य, आणि स्वदेश आणि वीर अर्जुन या दैनिकांच्या
संपादनाच काम बघू लागले. त्यानंतर जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सुरुवातीला त्यांचे टंकलेखक,सचिव,अनुवादक आणि मदतनीस अशी चौफेर जबाबदारी ते एकहाती निभावत असत. त्यांनी त्यांच्या त्यांच्या उत्तम वक्तृत्व कौशल्याचा उपयोग
करून घेतला.
वाजपेयींचे
राजकारणातील प्रारंभीचे गुरु होते, दीनदयाळ उपाध्याय. ते वाजपेयींसारखेच उच्चकुलीन हिंदू आणि पूर्णवेळ संघाला
वाहून घेतलेले कार्यकर्ते होते. शेतजमिनींबाबत पुनर्रधोरण, हिंदू जातीयेतील उच्च-निचतेच उच्चटन, इतर पक्षांशी सहकार्य यांसारखी धोरण
आखण्यासाठी आवश्यक असलेली वैचारिक बैठक वाजपेयीजींना दीनदयाळ यांच्याकडून लाभली.
त्यामुळेच भाजपचे नेतृत्व करताना त्यांना पक्षाचा सामाजिक,वैचारिक आणि भौगोलिक पाया अधिक व्यापक
होण्यास खूपच मदत झाली. आज संघ सुद्धा पेहेरावासकट वैचारिकदृष्ट्या बदलतोय
त्यामागचं एक कारण वाजपेयींनी आग्रहपूर्वक धरलेली सर्वसमावेशकता हे आहे.
राजनीतीज्ञ या
भूमिकेत वाजपेयींना अवगत असलेलं असामान्य वक्तृत्व आणि आत्मविश्वास हि त्यांच्या
राजकारणातील प्रदीर्घ कारकिर्दीतील अनेकविध भूमिकांची फलश्रुती म्हटलं पाहिजे.
वाजपेयींना संसद हे पवित्र मंदिर वाटत असे आणि तेथे ते नीटपणे तयार केलेली भलीमोठी
भाषण करत असत.
१९३९ सालापासून
ते थेट २१ व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत त्यांनी भारतीय जनजीवनातील अनेक महत्वाचे
विषय हाताळले आणि त्यात प्रयोग केले. साम्यवादापासून स्वदेशीपर्यंत आणि
उदारीकरणापर्यंत विविध बाबींची त्यांनी सक्रिय दखल घेतली. वाजपेयी अत्यंत कुशल
राजकारणी होते आणि कोणत्या वेळेस कोणती खेळी खेळणं योग्य ठरेल हे ताडून
जागरूकतेने ते बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत असत.
संघातील काही गट
वाजपेयींना ढिसाळ संघटक,
संधीसाधू आणि
मार्गच्युत समजत होते. परंतु तरीसुद्धा त्यांचं महत्व उत्तरोत्तर वाढतच गेलं.
त्यांचे वाईटात वाईट टीकाकार सुद्धा नाईलाजानं कबुल करत कि, ते वरकरणी निरुपद्रवी भासणार बाह्यरूप अत्यंत
फसवं होत. त्यांच्या तीक्ष्ण कानातून काहीही सुटत नसे. आपल्याला कमी लेखणाऱ्या
शत्रुंना ते असे काही नामोहरम करीत कि, त्यांची राजकीय कारकीर्द संपून जात असे.
मात्र कठीण परिस्थिती अखेरच्या क्षणी निसटता विजय मिळवण्यात ते माहीर होते.
१९६२ च्या चीन
आक्रमणानंतर वाजपेयी आणि त्यांच्या पक्षातले मूठभर सदस्य पंडित नेहरूंच्याकडे गेले
आणि त्यांनी आक्रमणाबाबत चर्चा घडवण्यासाठी संसदेची संयुक्त बैठक घ्यावी अशी मागणी
केली,
तेव्हा तत्कालीन
पंतप्रधान नेहरूंनी त्यांची हि मागणी ताबडतोब मान्य केली कारण त्यांना माहित
होते...हा तरुण पुढे आपल्या देशाचा पंतप्रधान होणार आहे.
शेवटी
कविहृदयाच्या राजकारणपटूंच
अस्ताला जाताना वर्णन करताना लिहावंसं वाटत -
आयुष्याच्या
संध्यासमयी चैतन्य उसळावं
प्रकाश अस्ताला
जाण्यापूर्वी त्वेषान सज्ज व्हावं
रवींद्र मालुसरे
अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र
लेखक संघ मुंबई
९३२३११७७०४
या ब्लॉगवरील इतरही विषय वाचण्यासाठी अनुक्रमणिका वाचा ...प्रतिक्रिया द्या लिंक इतरांना पाठवा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा