पोस्ट्स

भरतशेठ गोगावले लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पोलादपूर तालुका अविकसित यापुढच्या काळात ही ओळख पुसूया

इमेज
पोलादपूर तालुका अविकसित यापुढच्या काळात ही ओळख पुसूया.... मंत्री भरतशेठ गोगावले आणि प्रवीण दरेकर  मुंबई ( रवीन्द्र मालुसरे) : - सत्कारापेक्षा आम्ही तुम्हाला काहीतरी देण्यासाठी आलो आहोत. आम्ही दोघेही खेडेगावात जन्मलो आहोत, रानावनात हिंडलो आहोत. मोठे झालो असलो तरी जमिनीवरून चालणारे आहोत. आपल्या तालुक्यातील डोंगर, दऱ्याखोरी, वाटा आम्ही धुंडाळल्या आहेत त्यामुळे आपले प्रश्न काय आहेत याची आम्हाला नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही. तेव्हा आमच्या दोघांच्याही सत्तेच्या पदाचा लाभ या तालुक्याला व्हावा असे आम्हाला  वाटते आहे. यापुढच्या काळात आपण सर्वानी आपल्या पोलादपूर तालुक्याची अविकसित तालुका ही ओळख पुसूया अशी ग्वाही राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना भरतशेठ गोगावले यांनी पोलादपूरवासियांना दिली. मुंबई-ठाणे येथील पोलादपूरवासियांच्या वतीने घाटकोपर मुंबई येथे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना भरतशेठ गोगावले बोलत होते. भरगच्च गर्दी झालेल्या या सभागृहात पोलादपूरचे सुपुत्र आणि  बहुचर्चित छावा या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा नागरी स...

पोलादपूर स्नेहसंमेलन सत्कारमूर्तींचा आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय

इमेज
पोलादपूर तालुक्यातील मुंबई - ठाणे येथील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनाचे मुख्य पाहुणे म्हणून दुर्गमहर्षी आप्पा परब तर लक्ष्मण उतेकर यांची मुलाखत घेण्यासाठी साहित्यिक प्रल्हाद जाधव उपस्थित होते. या संमेलनात माननीय लक्ष्मण उतेकर, नामदार भरतशेठ गोगावले साहेब, आमदार प्रवीणभाऊ दरेकर, मा संजीव धुमाळ, स्वप्निल पांडुरंग चव्हाण, डॉ ओंकार मारुती कळंबे, कुमार संग्राश निकम, नेहा विलास शिरावले, ऍड निलेश मारुती जाधव यांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींचा आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय :- माननीय लक्ष्मण उतेकर - सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे नाव असलेले लक्ष्मण उतेकर हे पोलादपूर तालुक्यातील मोरसडे गावचे. लक्ष्मण हे मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधासुधा मुलगा, सामान्य बुध्दिमत्तेचा मापदंड असलेला चारचौघांसारखा. वडीलांना शेतीकामात मदत करताना शेत नांगरणे, गाई-बैलांना चारा घालणे, गाईचे दुध काढणे या सगळ्या गोष्टी लक्ष्मण उतेकर यांनी केल्या आहेत. या सर्व काबाडकष्टांचे मला भांडवल करायचे नाही कारण माझ्या आयुष्यातील हे सर्व क्षण मी सकारात्मक जगलो,...

पर्यटनाला चालना देण्यासाठी महाड-पोलादपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसांचा विकास करणार - ना. भरतशेठ गोगावले

इमेज
पर्यटनाला चालना देण्यासाठी महाड-पोलादपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसांचा विकास करणार - ना. भरतशेठ गोगावले पोलादपूर (रवींद्र मालुसरे)  - रायगड जिल्ह्याला विशेषतः महाड आणि पोलादपूर तालुक्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या संपन्नतेचा वारसा लाभला आहे. प्रागैतिहासिक काळापासून मानवी संस्कृतीची जडण-घडण आपल्या जिल्ह्यात होत असल्याचे ठोस पुरावेदेखील अलिबाग, महाड सारख्या ठिकाणी उपलब्ध आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात तर या भूमीत जन्मलेल्या शूरवीर मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्याच्या स्थापनेसाठी मोलाची कामगिरी केली. नरवीर तान्हाजी मालुसरे, नरवीर सूर्याजी मालुसरे, नरवीर मुरारबाजी देशपांडे, परमानंदबाबा, रायगड किल्ला, कांगोरी किल्ला, चंद्रगड किल्ला वैगरे इतिहासाच्या अनेक  ऐत्याहासिक वारसाच्या खुणा अस्तित्वात आहेत. या वारशाची महती जगाला पटवून देण्यासाठी पर्यटनासारखा दुसरा पर्याय नाही. पर्यटन आणि ऐतिहासिक, सांस्कृतिक, नैसर्गिक, भौगोलिक स्थळांचा अतिशय नजीकचा संबंध येतो. कधीकाळी इतिहासाची सुवर्णपाने असलेली ही स्थळे जपण्याचा त्यांचे संवर्धन करण्याचा आटोकाट प्रयत्न मी करणार आहे. म...

नामदार भरतशेठ गोगावले ....लोकनेता घडताना

इमेज
 नामदार भरतशेठ गोगावले ....लोकनेता घडताना  रोजगार हमी,फलोत्पादन खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद  मी .... भरतशेठ विठाबाई मारुती गोगावले ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित.....  रोजगार हमी,फलोत्पादन मंत्रिपदाची शपथ घेताना आमदार भरत गोगावले यांच्या तोंडून हे शब्द महाड -पोलादपूर-माणगावकरांनी ऐकले आणि एकच जल्लोष गावागावात वाडीवस्तीवर उसळला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षांपूर्वी सत्तातंर झाल्यानंतर आलेल्या मंत्रिमंडळात खरे तर भरतशेठ गोगावले यांचा सर्वाधिक हक्क होता. याचे कारण महाआघाडीचे सरकार जाण्यासाठी जे घडले होते त्यात आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार आणण्यात त्यांचा वाट महत्वाचा होता. त्याला रायगडमधील सत्ता संघर्षाबरोबर दुसरी आर्थिक बाजुही होती.  आघाडी सरकार स्थापन झाल्याबरोबर आदिती तटकरे पालकमंत्री झाल्याबरोबर अगोदर स्थानिक पातळीवर व नंतर राज्यपातळीवर ही अस्वस्थता पोहोचली होती. २० जुनला बंड झाले परंतु त्याअगोदर ६ महिने भविष्यात मंत्रिपद जवळ आलेय जरा धीर धरा असे सकारात्मकरित्या जवळच्या कार्यकर्त्यांना भरतशेठ ठामपणे हे सांगत होते. परंतु...