पोस्ट्स

पराक्रमाची विजयगाथा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पराक्रमाची विजयगाथा

इमेज
पराक्रमाची विजयगाथा  नरव्याघ्र नरवीर सुभेदार तानाजी - सूर्याजी मालुसरे यांच्या शौर्यावर, स्वराज्य बांधणीसाठी केलेल्या योगदानावर आणि बलिदानावर समग्र माहिती देणारा मराठीतील पहिला आणि एकमेव ग्रंथ || सुभेदार नरवीर तान्हाजी-सूर्याजी मालुसरे             पराक्रमाची विजयगाथा || या नावाचा ग्रंथ मी प्रकाशित करीत आहे. मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सर्वोच्च घटना म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. इतिहासाच्या प्रवाहाला नवे वळण देणारी घटना. यापूर्वी हिंदवी स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक मावळ्यांनी रणागंणात समशेर पेलत साथ दिली. प्रसंगी रक्ताचा सडा शिंपत बलिदान दिले. नरव्याघ्र नरवीर सुभेदार तानाजी - सूर्याजी मालुसरे यांनी लढलेली आणि शर्थ करीत जिंकलेली कोंढाण्याची लढाई हा स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातील सुवर्णक्षण ! या घटनेनेसुद्धा शिवकार्याच्या इतिहासाला वेगळे वळण दिले. १९-२० व्या शतकातील बखरकारांनी, इतिहासकारांनी, पोवाडे रचणाऱ्यांनी आजवर विविध अंगी लेखन केले आहे; पण इतक्या महत्त्वाच्या विषयावर समग्र असा ग्रंथ आता उपलब्ध झाला नाही. तो ...