पोस्ट्स

नरवीर तानाजी मालुसरे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पराक्रमाची विजयगाथा

इमेज
पराक्रमाची विजयगाथा  नरव्याघ्र नरवीर सुभेदार तानाजी - सूर्याजी मालुसरे यांच्या शौर्यावर, स्वराज्य बांधणीसाठी केलेल्या योगदानावर आणि बलिदानावर समग्र माहिती देणारा मराठीतील पहिला आणि एकमेव ग्रंथ || सुभेदार नरवीर तान्हाजी-सूर्याजी मालुसरे             पराक्रमाची विजयगाथा || या नावाचा ग्रंथ मी प्रकाशित करीत आहे. मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सर्वोच्च घटना म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. इतिहासाच्या प्रवाहाला नवे वळण देणारी घटना. यापूर्वी हिंदवी स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक मावळ्यांनी रणागंणात समशेर पेलत साथ दिली. प्रसंगी रक्ताचा सडा शिंपत बलिदान दिले. नरव्याघ्र नरवीर सुभेदार तानाजी - सूर्याजी मालुसरे यांनी लढलेली आणि शर्थ करीत जिंकलेली कोंढाण्याची लढाई हा स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातील सुवर्णक्षण ! या घटनेनेसुद्धा शिवकार्याच्या इतिहासाला वेगळे वळण दिले. १९-२० व्या शतकातील बखरकारांनी, इतिहासकारांनी, पोवाडे रचणाऱ्यांनी आजवर विविध अंगी लेखन केले आहे; पण इतक्या महत्त्वाच्या विषयावर समग्र असा ग्रंथ आता उपलब्ध झाला नाही. तो ...

नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी मुंबईत साजरी

इमेज
जो देश इतिहास विसरतो त्या देशाचा भूगोलही बिघडतो - वीरमाता अनुराधा गोरे नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी मुंबईत साजरी मुंबई (रवींद्र मालुसरे ) : जो देश इतिहास विसरतो  त्या देशाचा भूगोलही बिघडतो. एव्हढेच नव्हे तर त्या देशातील माणसे इतिहास घडवण्याची क्षमता सुद्धा निर्माण करू शकत नाहीत.  दुर्दैव म्हणजे १९४७ नंतर आपला खरा इतिहास दडवून ठेवला गेला.  नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज म्हणून मुंबईत हा शौर्य दिन मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा करीत आहात तो हा क्षण आमच्यासाठी सुद्धा अभिमानाचा आहे. त्या निमित्ताने तुम्ही इतिहासाची उजळणी करीत आहात असे भावपूर्ण उद्गगार वीरमाता अनुराधा गोरे यांनी काढले. शिवसेना शाखाप्रमुख क्रमांक २० चे विजय  मालुसरे आणि मालुसरे बंधू ऐक्यवर्धक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त शौर्य दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या पुढे असेही म्हणाल्या की, ३५० वर्षांपूर्वी इतिहास घडवलेल्या एका पिढीचे तुम्ही वारस आहात हे कदापि विसरू नका.  छत्रपतीं शिवाजी महाराजांचा जन्म पारतंत्र्यात झा...

"स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. अंबाजीराव मालुसरे यांचा दोस्ताना

इमेज
  "स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. अंबाजीराव मालुसरे यांचा दोस्ताना"  स्व यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त एक आठवण द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी १ नोव्हेंबर १९५६ रोजी सूत्रे हाती घेतली. त्यावेळची घडलेली गोष्ट. साताऱ्याच्या जेलमधला आपला एक सहकारी सर्वात मोठया पदावर बसल्याचा सर्वाधिक आनंद साखर गावच्या स्वातंत्र्यसेनानी अंबाजीराव मालूसऱ्यांना झाला. आणि ते तडक मुंबईत दाखल झाले. करीरोडला खोजा चाळीतील नातेवाईकांकडे उतरल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते जुन्या मंत्र्यालयाकडे निघाले. सोबत त्याच चाळीतील घाटावरचा वसंत पाटील नावाचा तरुण होता. धोतर, सदरा, फेटा आणि घुंगराची काठी या वेशभूषेत अंबाजीराव मंत्र्यालयाच्या गेटवर पोहोचल्यानंतर तडक आतमध्ये घुसले...त्यावेळी आजच्या इतकी कडक सुरक्षा बंदोबस्त नसे. पोलीस अडवू लागले तेव्हा बेडर अंबाजीराव मोठया आवाजात म्हणाले, मी यशवंताला भेटायला आलोय. त्याचे हाफीस कुठं आहे ते सांगा. ते पोलीस काहीच ऐकायला तयार नव्हते...इकडे अंबाजीरावांचे दरडावणे चालूच होते. मी साखर गावचा पाटील. सुभेदार तान्हाजीरावांचा वंशज. जाऊन सांगा यशवंतरावाला अंबा...

गिरिदुर्गांचा वाटाड्या.... दुर्गमहर्षी आप्पासाहेब परब

इमेज
  गिरिदुर्गांचा वाटाड्या.... दुर्गमहर्षी आप्पासाहेब   परब                              -  रवींद्र मालुसरे ( अध्यक्ष ,  मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई) आप्पा परब .....  एक सामान्य गिरणी कामगार ,  दादरच्या रानडे रोडवरच्या फुटपाथवर जुनी पुस्तके ,  दिवाळी अंक ,  नियतकालिके विकणारे विक्रेते ,  प्रख्यात नाणी संग्राहक व नाणी तज्ज्ञ  ते इतिहास संकलक - संशोधक हा आप्पांचा जीवनप्रवास ऐकून कोणीही थक्क होऊन जावे अशीच आप्पांची ८६ वर्षाची आयुष्यभराची वाटचाल आहे.   शिवछत्रपतींना दैवत मानणार्‍या या व्रतस्थ इतिहासपुरूषाशी माझा तीन तपाचा स्नेह आहे. मला लहानापासून वाचनाची प्रचंड भूक ,  त्यामुळे नवीन काही शोधताना दादरमधल्या रद्दीवाल्यांच्या दुकानात डोकावत असे. रानडे रोडवरील पटवर्धन ब्रदर्स हे आयुर्वेदिक दुकान सोमवारी बंद असे त्यामुळे एक दाढीधारी व्यक्ती आपल्याकडील सर्व ठेवा बंद दुकानासमोर ऐसपैस मांडत असे. ते सहज चालता बघता येत असल्याने महिन्यातून दोन तीन सोमवारी त्याठिकाणी ...

शिवरायांचा विचार देशाला प्रेरक – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

इमेज
शिवरायांचा विचार देशाला प्रेरक – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया  (रवींद्र मालुसरे )किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४२ व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (दि.१६) आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. या वेळी त्यांनी शिवरायांनी जातीपातीच्या आणि अंधश्रद्धेच्या पलीकडे जात अखंड भारताचे स्वप्न साकार केले. त्यामुळे बहुजन हिताय बहुजन सुखाय या त्यांच्या विचारातूनच देश पुढे गेला पाहिजे असे प्रतिपादन केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने शिवपुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.केंद्रीय मंत्री आणि महान सेनानी महादजी शिंदे यांचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रथम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत पुष्पहार अर्पण करीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर राजसदरस्थळी झालेल्या सभेत बोलताना त्यांनी आपण पाहुणे नसून या मातीमधलाच एक मराठा असल्याचे सांगितले. ते म्हणाले मराठ्यांचा इतिहास देशाच्या कानाकोपर्‍यात असून शौर्य, बलिदान आणि वीरता अ...

१२७ वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील समस्त मालुसरे परिवाराचा सन्मान होणार

इमेज
       रायगड किल्ल्यावर ३४२ वा शिवपुण्यतिथी सोहळा श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने रायगड किल्ल्यावर ३४२ वा शिवपुण्यतिथी सोहळा दि १५ व १६ एप्रिल २०२२ रोजी आयोजित केला आहे. यावेळी भारत सरकारमधील केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ना ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर आणि इतिहास संशोधक डॉ उदय कुलकर्णी यांना अकरावा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार , व्हाईस ऍडमिरल मुरलीधर पवार यांना सैन्यदल अधिकारी सन्मान पुरस्कार तर सरदार घराण्यासाठी देण्यात येणारा सन्मान पुरस्कार यंदा महाराष्ट्रातील ७० हून अधिक गावांत स्थायिक असलेल्या समस्त मालुसरे परिवाराला देण्यात येणार असल्याची घोषणा सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे यांनी केली आहे. १२७ वर्षापूर्वी २५ एप्रिल १८९६ मध्ये लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या उत्सवात त्यावेळी तानाजी मालुसरे व येसाजी कंक इत्यादींच्या वंशजांस मानाचे नारळ देण्यात आल्याची नोंद त्यावेळच्या दैनिक केसरी आणि ऐतिहासिक दप्तरात करण्यात आली आहे. अस...