अंबरनाथ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अंबरनाथ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

विधानसभेवर महायुतीचा भगवा फडकणार..






विधानसभेवर मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब  
यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा भगवा फडकणार..
-- भरतशेठ गोगावले
अंबरनाथ पूर्व श्री स्वामी समर्थ हॉल येथे महाड-पोलादपूर-माणगाव तालुक्यातील अंबरनाथ बदलापूर, उल्हासनगर कल्याण मध्ये राहणाऱ्या  शिवसैनिक रहिवाशांचा *संवाद मेळावा* माढा लोकसभा सहसंपर्क प्रमुख/ परभणी लोकसभा निरीक्षक *श्री सुभाष साळुंके*(मा.नगरसेवक) यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शिवसेना पक्ष प्रतोद उपनेते तसेच महाड विधानसभेचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले साहेब व अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी शिवसेना जळगांव पक्ष निरीक्षक/मा. नागराध्यक्ष श्री. सुनिल चौधरी,रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख श्री. चंद्रकांत कळंबे, महाड महिला विधानसभा संपर्क प्रमुख सौ. शलाका पाटील, महाड तालुका संपर्कप्रमुख श्री. इकबाल चांदळे,पोलादपूर तालुका संपर्क प्रमुख श्री. किशोरभाऊ जाधव, माणगाव तालुका संपर्काप्रमुख श्री. राकेश तुपट,महा श्री.राजुशेठ रिंगे,महाड महिला सह संपर्क प्रमुख सौ. संस्कृती वाळुंज,महाड तालुका समन्वयक श्री. तुळशीराम पोळ, पोलादपूर महिला संपर्कप्रमुख सौ. सुगंधा मोरे,  तालुका महिला संपर्क प्रमुख सौ.सुनंदा कदम उपस्थित होते.
यावेळी सौ. सुवर्णा साळुंके यांनी राजकारणातून समाजकारण यांची सांगड घालून विकास व जनसेवा करता येते, याचे उदाहरण म्हणजे आमदार भरत शेठ गोगावले आहेत,असे प्रास्तविक करताना सांगितले.
मेळावाचे प्रमुख आयोजक  श्री .सुभाष साळुंके यांनी  पुन्हा एकदा भरत शेठ गोगावले व डॉ.बालाजी किणीकर आमदार का हवेत व करावेत ? यआमदारांनी केलेली विधानसभेत केलेली प्रचंड विकासकामे,फॅमिली आमदार म्हणून झालेली ओळख, सर्वसामान्यांना असलेला आधार व सहकार्याची भूमिका ,महाराष्ट्र राज्याचे सर्वसामान्यांचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विश्वासू सहकारी असलेली प्रतिमा ,याबाबत सविस्तर विवेचन  तसेच महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासासाठी पुन्हा विधानसभेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी महाड व अंबरनाथ विधानसभा  शिवसेनेच्या धनुष्यबाण वरती जिंकण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी,असे आवाहन श्री. सुभाष साळुंके यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसंपर्कप्रमुख श्री. प्रमोद गोगावले  व वरंध विभाग संपर्क प्रमुख श्री. नथूराम कोंडाळकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुर्भे संपर्क प्रमुख श्री. राकेश जाधव,शांताराम पवार,पप्पू मोरे, अनंत यादव, श्याम उतेकर,विश्वनाथ उतेकर, कांनहूबुवा सकपाळ,बबन घावरे, रमेश डेरे, नंदू निकम,अजित वायकर, दिपक भोसले,चंद्रकांत फाळके,गोविंद शेडगे, शंकर उतेकर, अदनान शेख,सौ. शिल्पा शिंदे,सौ.सुनंदा मांढरे, सौ.सुप्रिया दुधाणे, इ.नी परिश्रम घेतले. 

इतर पोस्ट वाचण्यासाठी समोरची 👉अनुक्रमाणिक clik करा 

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...