महाकवी कालिदास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाकवी कालिदास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १६ मे, २०२०

कालिदासाची प्रतिभा : मेघदूत


कालिदासाची प्रतिभा : मेघदूत


 महाकवी कालिदास कुणाला माहिती नाही. फक्त भारतीयच नव्हे तर सगळे जग हा थोर कवी आणि नाटककार होता असे मानते. पण त्याच्याबद्दल म्हणजे वैयक्तीक आयुष्याबद्दल फारसे काही काळात नाही. कविकुलगुरू कालिदासाविषयी आतापर्यंत पुष्कळ संशोधन झाले आहे. त्याचा काल, त्याचे जन्मस्थान, त्याचा नाश्रयदाता विक्रमादित्य, त्याचे ग्रंथ, त्याचे विचार वगैरेविषयी अनेक विद्वानांनी चर्चा केली आहे. तथापि बद्यापि त्याच्या स्थलकालाविषयी आणि त्याच्या जीवनातील घटनांविषयी विद्वानांचे एकमत झाले नाही. त्याविषयी विविध तर्क केले जातात.

इतिहास पंडितांच्या अभ्यासानुसार तो सम्राट विक्रमादित्याच्या पदरी होता. त्यामुळे कालिदासाचा काल बहुधा इ स पूर्व पहिले शतक असा येतो. तर पाश्चत्त्य पंडितांच्या मते कालिदास ११ व्या शतकातील धारा नगरीचा राजा भोज ह्याच्या पदरी होता. गेल्या दशकात कर्नाटकात काही पुरावे सापडल्यानंतर कालिदास  ४ थ्या किंवा ५ व्या शतकाच्या कालखंडात होऊन गेला असावा असे माननाल्या  सबळ पुरावा आहे. भविष्यात अजून काही पुरावे, शिलालेख, जुनी हस्तलिखिते सापडली तर अधिक प्रकाश पडेल. परंतु कालिदासभोवती दंतकथा आणि आख्यायिकांचे एक जाळे तयार झाले आहे. कालिदास हा जन्माने गवळी. त्यामुळे सुरुवातीला अशिक्षित होता. पण दिसायला अत्यंत राजबिंडा अन देखणा होता.तर ह्या गवळ्याच्या पोराचा महाकवी कसा झाला मोठे रंजक आहे. कालिदासाने मालविकाग्निमित्र, शाकुंतल, विक्रमोर्वशीय  ही तिन नाटके, रघुवंश, कुमारसंभव ही दोन महाकाव्ये, मेघदूत हे खंड काव्य आणि ऋतुसंहार हे निसर्ग काव्य लिहिले.


‘आषाढ’ महिना म्हटलं की, आठवतो ढगांच्या काळ्या पुजक्यांआडून गर्जना करत धो धो बरसणारा मुसळधार पाऊस आणि कवी कालिदासाची स्वतंत्र अभिजात साहित्यकृती असलेलं ‘मेघदूत. निसर्ग, प्रदेश, माणसं याबद्दलचं कालिदासाचं भान आणि जाण, अवघ्या सृष्टीबद्दल वाटणारं प्रेम हे आपल्याला या आषाढात सदोदित जाणवत राहतं आणि मनात तरळते ती ‘मेघदूत’ या सर्वागसुंदर प्रेमकाव्यातली पहिली ओळ ‘आषाढस्य प्रथम दिवसे।’ पावसाचा सांगावा घेऊन आलेला ‘ज्येष्ठ’ संपला आणि आषाढाला सुरुवात झाली कि निळ्या जांभळ्या मेघांनी आभाळ भरून येतं. गरजू लागतं. पावसाचे टपोरे थेंब ताल धरू लागतात. मध्येच वाराही उनाड मुलासारखा धिंगाणा घालतो. उकाडयानं त्रस्त झालेल्या धरणीला आषाढसरींचा शिडकावा हवाहवासा वाटतो. ओल्या मातीच्या गंधानं उल्हसित झालेलं वातावरण होरपळलेल्याधरणीला आणि आपल्या मनालाही तजेला देतं.आषाढातली सृष्टीची ही रूपं पाहून प्रेमीजनांच्या प्रेमभावना ही उत्फल्ल होतात. पावसाचं भरभरून दान देणारी, प्रेमिकांना एका अनोख्या रंगात भिजवून चिंब करणारी आषाढवेळा म्हणूनच तर महाकवी कालिदासालाही भावली असावी. कालिदासाचे ‘मेघदूत’ हे एक सर्वागसुंदर प्रेमकाव्य आहे. ते कुठल्याही पुराणकथेवर आधारलेलंनाही. मानवी अंत:करणातील प्रेमाचा आणि त्यातून उद्भवणाया विरहवेदनांचा तो सुस्पष्ट आविष्कार आहे. कालिदासाची ‘मेघदूत’ ही एक साहित्यकृती वाचल्यावर तो स्वत: किती सुजाण रसिक होता, याची कल्पना येते.


प्रेम कसे व्यक्त करावे, हे कालिदास सहज सोप्या संकेतांनी सुचवतो. आणि जीवनाकडे कसे पाहावे याचेही मेघाच्या सोबत आपल्याला 'मार्गदर्शन' करतो. होय 'मेघदूत' या अजरामर काव्यामध्ये फक्त उपमा-उत्प्रेक्षांचा जलसा नाही, चमकदार शब्दांची दिमाखदार आतषबाजी नाही. तर त्यात मानवी मनाच्या विविध छटांचा रंगोत्सव पाहायला मिळतो एक वर्षासाठी गाव सोडण्याची शिक्षा लाभलेला हा विरहात बुडालेला यक्ष पहिले आठ महिने कसेतरी काढतो पण , आषाढाच्या पहिल्याच दिवसाने त्याचा सारा  संयम सुटून जातो.   त्याला पत्नीची आठवण अस्वस्थ करू लागते. आपल्या पत्नीशी संवाद साधण्यासाठी तो यक्ष  पर्वतावर टेकलेल्या मेघालाच आपले कुशल विरहव्याकुळ पत्नीपर्यंत पोहचवण्याची विनंती करतो. मेघदूताची या कामासाठी अनुमती आहे कि नाही , याची साधी विचारणा करण्या एव्हढा धीर कालिदासापाशी नाही. तो त्या ढगाची प्रतिक्रिया काय याचा विचार सुद्धा करीत नाही. आणि त्याला  अलकापुरीत, यक्षनगरीत  राहणाऱ्या आपल्या पत्नीला संदेश देण्याचे काम सोपवतो. ढगसुद्धा त्याचा आग्रह मोडत नाही. आता खराप्रश्न पुढे आहे. खर तर मेघदूतची  कथा खूप साधी. आजीच्या गोष्टीसारखी. पण कालिदासाने त्याला जे प्रतिभेचे अफलातून पैलू पाडलेत , त्याला तोड नाही. ती  गोष्ट आहे एका यक्षाची.  अलकापुरीत, यक्षनगरीत  राहणाऱ्या  कोण्या एका यक्षाकडून त्याच्या कर्तव्यात काही चूक घडली आहे. कुबेर हा त्यांचा राजा आहे,  'चुकीला माफी नाही ' असा पवित्रा घेत तो  या यक्षाला 'तडीपारी'ची म्हणजे अल्कानगरी एक वर्षासाठी सोडण्याची 'सजा' देतो. नुकत्याच लग्न झालेल्या या यक्षाला पत्नी विरहाचा शाप बसतो  आणि तिथूनच कथा यक्षाच्या भावनिक चढ उतारासोबत  वळणावळणांनी पुढे सरकते. ‘मेघदूता’ला कोणतीही पूर्वपीठिका वा कथानक नाही. कालिदास यक्षाला का गावाबाहेर काढले याचे साधे कारणही सांगत नाही, मग त्याच्या घराविषयी, पत्नीसंदर्भात माहिती द्यायची त्याला गरज वाटत नाही. आता बोला, तर सुरुवातीलाच आपल्याला धक्का देऊन कालिदास गोष्ट सुरु करतात. कुबेराने गावाबाहेर काढलेला  अलकापुरीचा हा यक्ष महाराष्ट्रातील नागपूर जवळच्या रामटेकला येतो . ज्याठिकाणी वनवासातील राम टेकला, थांबला होता, ते स्थान   म्हणजे रामटेक.  एक वर्षासाठी गाव सोडण्याची शिक्षा लाभलेला हा विरहात बुडालेला यक्ष   पहिले आठ महिने कसेतरी काढतो पण , आषाढाच्या पहिल्याच दिवसाने त्याचा सारा  संयम  सुटून जातो.   त्याला पत्नीची आठवण अस्वस्थ करू लागते. आपल्या पत्नीशी संवाद साधण्यासाठी तो यक्ष  पर्वतावर टेकलेल्या मेघालाच म्हणजे आकाशातील ढगाला आपले कुशल विरहव्याकुळ पत्नीपर्यंत पोहचवण्याची विनंती करतो.हे व्यक्त करताना त्यात विरहाचा वणवा  आहे पण त्यावर  शृंगाररसाचा वर्षाव करीत   प्रत्येक श्लोक  लिहिणारा कालिदास हा भारतातील साहित्याला जागतिक पातळीवर घेऊन   जातो . कारण त्याच्या सहज व्यक्त होण्यातही माणसाच्या निसर्गाशी असणाऱ्या  वैश्विक   संबंधांचा उच्चतम अविष्कार आहे. वाढतच जाणाया विरहात त्याच्या मनाला कशाचंच भान  राहात नाही. तो त्या अचेतन मेघालाच आपला दूत बनवू पाहतो. त्या मेघाच्या संमतीची वाटही न पाहता त्याच्यावर दुताचं काम सोपवून टाकतो. दूरवर, हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या अलकानगरीत यक्षाची अतिप्रिय पत्नी राहात असते. तिला या मेघानं आपला संदेश सांगावा, आपल्या सांत्वनाचे शब्द तिच्यापर्यंत पोहोचवावेत, अशी यक्षाची इच्छा असते. यासाठी मेघाने अलकानगरीपर्यंत कसा प्रवास करावा, हे तो त्या मेघाला समजावून सांगतो. अलकानगरीत   पोहोचल्यावर त्याच्या प्रियेचं निवासस्थान कसा शोधावा, तिला कसं ओळखावं,  हेही तो   समजावून सांगतो. एवढाच ‘मेघदूत’ या काव्याचा कथाविषय.कथानक असं फारसं काही नाही आणि तरीही त्यातला प्रत्येक श्लोक नितांत रमणीय झाला आहे. कारण त्यात निसर्गाचं रूप   वर्णन आहे, त्याच्या आश्रयानं प्रेमिकांच्या भावभावनांचं प्रकटीकरण आहे. हा आविष्कार   अत्यंक तरल असला तरीही अतिशय उत्कट आहे.सध्या यक्षाची वस्ती असलेल्या रामगिरी पासून यक्षपत्नीचं निवास असलेल्या अलकानगरीपर्यंतच्या प्रदेशातल्या मुख्य खुणा यक्ष   मेघाला सांगतो. हे प्रदेशवर्णन सौंदर्यपूर्ण तर आहेच, त्याबरोबर त्या मेघाची स्तुतीही त्यात   आहे, त्याला काही क्रीडा सूचित केल्या आहेत. कालिदासाची ‘मेघदूत’ ही एक साहित्यकृती   वाचली तरी तो स्वत: किती सुजाण रसिक होता, याची कल्पना येते. निसर्ग, प्रदेश, माणसं   यांबद्दलचं त्याचं भान आणि जाण, त्यांबद्दल वाटणारं प्रेम हे आपल्याला ठायीठायी जाणवत राहातं. खरं तर मेघाच्या अलकानगरीच्या प्रवासमार्गात उज्जयिनी ही नगरी येत नाही. तरीही ती पाहण्यासाठी मेघानं जरा वाट वाकडी धरावी, असं यक्ष त्याला सांगतो आणि उज्जयिनीच्या सौंदर्याचं वर्णन करतो. या वाकडया रस्त्यामुळे मेघाला आपल्या पत्नीकडे पोहोचायला उशीर   होणार आहे, हे यक्षाला कळत असतं. तरीही मेघानं उज्जयिनीला जावेच, असा यक्षाचा आग्रह असतो. ही रसिकता प्रत्यक्षात कालिदासाचीच रसिकता आहे, हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. 

या मेघदूताने अलकापुरीपर्यंतचा प्रवास कसा करायचा ? मेघदूताचे खरे सौंदर्य हेच प्रवासवर्णन आहे. यक्ष प्रत्येक श्लोकागणिक  निसर्गातील रंगचित्रे मोठ्या बहारीने सादर करतो आणि मेघाला आपल्या प्रियपत्नीपर्यंत पोहचण्याचा मार्ग सांगतो . त्याच्या या कथनामध्ये सहजपणे येणाऱ्या प्रेमाच्या उत्फुल्ल आविष्काराच्या कल्पनाविलासाने  मन मोहून जाते. त्याचे शब्द अलंकारिक असतात पण कल्पनांची उंची तुम्हाला मेघदूताची 'नजर'बहाल करते,सृष्टीतलं जे काही उत्तम, उदात्त, सुंदर, मंगल असतं, ते सगळं खया प्रतिभावंताला मोहात पाडतं. कालिदासाच्या प्रतिभेचा आविष्कार जसा आपल्याला निसर्गवर्णनात, प्रदेश वर्णनात,   उज्जयिनी किंवा अलकापुरीच्या वर्णनात आढळतो तसाच तो त्यानं केलेल्या व्यक्तिचित्रणातसुद्धा आढळतो. 


अलकापुरीत असणाया आपल्या पत्नीला कसं ओळखायचं हे सांगताना यक्ष   मेघाला म्हणतो, ‘‘जिनं बोलणं मर्यादित केलं आहे, जी माझा जणू दुसरा प्राणच आहे (जीवितं मे द्वितीयं), मी तिचा प्रियकर शापामुळे तिच्यापासून दुरावल्यामुळे जी चक्रवाक पक्षिणीप्रमाणे एकटी पडली आहे आणि सांप्रतच्या मोठया असणा- दिवसात (पावसाळ्यात दिवस मोठाच असतो) जिची   उत्कंठा गंभीर झाली आहे, अशी बाला माझी प्रिय पत्नी आहे, हे तू ओळख. खरोखर कालिदासाची शैली, त्याने केलेले शब्दप्रयोग हा विस्तृतपणे लिहिण्याचा विषय आहे. कालिदास हा   शब्दप्रभू होता. असं म्हटलं जातं की, त्याच्या मनात एखादा विचार प्रकटला की, तो स्पष्ट   करण्यासाठी अनेक शब्द त्याच्यासमोर उभे राहात. त्यांतला अभिप्रेत असणारा नेमका अर्थ  व्यक्त होईल आणि सौंदर्यही खुलेल, असा शब्द तो निवडत असे. एक उदाहरण म्हणून ‘मेघदूता’मधील पहिलाच श्लोक पाहा.‘‘कश्चित्कान्ता विरहगुरूणा स्वाधिकारात्प्रमत्ता!’’ इथं पत्नीसाठी ‘कान्ता’ हा शब्द कालिदासानं वापरला आहे. खरं पाहता पत्नीसाठी संस्कृतमध्ये भार्या, दारा, अर्धागिनी, परिणीता इत्यादी अनेक शब्द आहेत. मात्र कालिदासानं ‘कान्ता’ हाच शब्द निवडला. कारण कान्ता म्हणजे शृंगारात प्रिय असणारी पत्नी. ‘विरहगुरूणा’ म्हणजे तिचा विरह फार दीर्घकाळ सहन करत आहे. केवळ घरसंसार सांभाळणारी ही पत्नी नाही. तर ती नवतरुणी शृंगारात अत्यंत प्रिय वाटावी अशी आहे. म्हणूनच यक्ष   विरहाग्नीत तडफडतो आणि अशा बेभान अवस्थेत अचेतन मेघाला आपला दूत म्हणून निवडतो. ‘मेघदूत’ या काव्याचा गाभा ‘शृंगाररसा’वर आधारलेला आहे. त्यातही साहित्याच्या दृष्टीनं   श्रेष्ठ असा हा ‘विप्रलंभ- शृंगार’ म्हणजे विरहातला मनोवेधक शृंगार आहे. आता जगातील   बहुतेक प्रमुख भाषांमध्ये ‘मेघदूता’ची भाषांतरं उपलब्ध आहेत. भारतातल्या सगळ्याच भाषांमध्ये ‘मेघदूता’चे अनुवाद झाले आहेत. सध्याच्या भाषांमध्ये संस्कृतच्या सर्वात जवळची भाषा म्हणजे आपली मराठी. ‘मेघदूता’च्या अनुवादात तीच आघाडीवर आहे.प्रेम कसे व्यक्त करावे, हे कालिदास सहज   सोप्या संकेतांनी सुचवतो. आणि जीवनाकडे कसे पाहावे याचेही मेघाच्या सोबत आपल्याला 'मार्गदर्शन' करतो.  होय 'मेघदूत' या अजरामर काव्यामध्ये फक्त उपमा-उत्प्रेक्षांचा जलसा नाही, चमकदार शब्दांची दिमाखदार आतषबाजी नाही. तर त्यात मानवी  मनाच्या विविध छटांचा रंगोत्सव पाहायला मिळतो . मला कालिदास त्यामुळेच आवडतो,  भारतातील आणि  जगातील डझनावारी भाषांमध्ये मेघदूत पोहचलेले आहे. लक्षावधी   लोकांना आजही त्याची ओढ वाटणे, हेच कालिदासचे यश. तसे पाहायला गेलो तर हे महाकाव्य कधी लिहिले त्याचा नीटसा पुरावा उपलब्ध नाही. काही लोकांच्या मते ते २ - ३ हजार वर्षापूर्वीचे नक्की असणार. पण त्यातील नावीन्य नित्यनूतन आहे. हेच कवीच्या काव्यप्रतिभेचे यश म्हणावे लागेल. कालिदास हा असा शब्दांशी खेळणारा भाषाप्रभू होता,त्याने पहिल्यांदा  मेघाला त्याच्या कथानकाचे नायकत्व बहाल करून त्याबोवती यक्ष-यक्षिणीची कथा गुंफली. त्यात विरहाचा वणवा  आहे पण त्यावर  शृंगाररसाचा वर्षाव करीत प्रत्येक श्लोक  लिहिणारा कालिदास हा भारतातील साहित्याला जागतिक पातळीवर घेऊन जातो . कारण त्याच्या सहज व्यक्त होण्यातही माणसाच्या निसर्गाशी असणाऱ्या  वैश्विक संबंधांचा उच्चतम अविष्कार आहे.आषाढ हा महिना मोठा विलक्षण ज्येष्ठाच्या बरसातीने शांतावलेल्या धरतीला आषाढात खऱ्या अर्थाने हिरवा बहर येतो, आषाढ हा महिना मोठा विलक्षण ज्येष्ठाच्या   बरसातीने शांतावलेल्या धरतीला आषाढात खऱ्या अर्थाने हिरवा बहर येतो, आषाढ असा   आमच्या अवघ्या जीवनाला व्यापून असतो. संसार तापाने पोळलेल्या वारकऱ्यांची दिंडी जेव्हा पंढरपुरात पोहचते, तेव्हा कृष्ण मेघश्याम आषाढ दोन्ही कर कटेवर ठेवून वीटेवर उभा दिसतो. त्याचेच सावळे प्रतिबिंब प्रत्येक वारकऱ्यांच्या हृदयात उमटलेले. मग त्या हृदयांच्या असंख्य  तारा झंकारतात आकाशात ‘जय जय विठोब रखमाई’चा झणत्कांर होतो, वारकऱ्यांच्या   मनातील सावळा मेघश्याम आषाढ घन बनून बरसू लागतो. झाडांच्या पानापानातून वाजू   लागते टाळी आणि चंद्रभागेच्या पाण्यातून ऐकू येतात अभंग ओळी. ओल्या काळ्या मातीचा  होतो अबीर बुक्का आणि मनामनात भरून राहतो.... आकाशाएवढा तुका..










रवींद्र मालुसरे, (अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई )

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...