पोस्ट्स

नवलाई-भैरी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या गावात ग्रामदैवत आई नवलाई-भैरी पुनः प्राणप्रतिष्ठा आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा

इमेज
नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या गावात ग्रामदैवत आई नवलाई-भैरी पुनः प्राणप्रतिष्ठा आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा सुभेदार नरवीर तान्हाजी आणि सूर्याजी मालुसरे यांच्या साखर गावाचे ग्रामदैवत आई नवलाई-भैरी यांची पुनः प्राणप्रतिष्ठा ( जीर्णोद्धार ) आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा दिनांक २४ व २५ एप्रिल २०२५ रोजी संपूर्ण दोन दिवस धार्मिक आणि पारंपरिक रितिरिवाज पूर्ण करून पोलादपूर तालुक्यात संपन्न होत असल्याचे अध्यक्ष विनायकदादा मालुसरे आणि संतोष महादेव मालुसरे यांनी पत्रकार परिषदेद्वारे सांगितले आहे. ग्रामदैवतांची उत्पत्ती भारताच्या प्राचीन धार्मिक, सांस्कृतिक, आणि सामाजिक परंपरांशी निगडित आहे. विशेषतः महाराष्ट्रातील कोकण आणि इतर ग्रामीण भागांमध्ये ग्रामदैवतांना फार पुरातन काळापासून महत्त्व आहे. ग्रामदैवतांचा उगम कसा झाला, याविषयी अनेक दंतकथा, लोककथा, आणि धार्मिक आख्यायिका आहेत. आमच्या साखर गावाबाबतही असेच म्हणावे लागेल. प्राचीन काळात नैसर्गिक संकटे, राक्षसी शक्ती आणि जंगलातील प्राण्यांपासून गावे सुरक्षित नव्हती. देवावर श्रद्धा ठेवणारी साधी - भोळी माणसं असलेल्या गावकऱ्यांना त्यांच्या ज...