शनिवार, १६ मे, २०२०

लोकदेव पांडुरंगाचा महिमा


लोकदेव पांडुरंगाचा महिमा





वारी शब्दाचा अर्थ म्हणजे येरझारपंढरपूरची वारी करावयाची म्हणजे आपल्या घरुन पायी चालत पांडूरंगाच्या भेटीला पंढरपुरला जायचे आणि भगवंताला भेटून परत घरी यायचेवारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात
पंढरीचा वारकरी | वारी चुको  दे हरी || या उदात्त भावनेने लाखोंच्या संख्येने भक्तगण या पायी वारीमध्ये 
सहभागी होतात आणि चालत २१ दिवसांचा प्रवास करत पंढरपूर च्या विठ्ठलाला येऊन भेटतात.
अनेक भक्त एकत्र येऊन भजने गातकीर्तने करीत पंढरपूरला पायी जातात तेव्हा त्यांच्या समूहाला ‘दिंडी असे म्हणतातवारीची ही प्रथा फार जुनी आहेसंत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंड्यासोबत वारीला जात असत 
असे  सांगीतले जातेपूर्वी प्रवासाची साधने फारशी नव्हतीत्यामुळे लहान लहान समूहाने लोक पंढरपूरला 
जात असतत्यामुळे ही प्रथा किती जुनी आहे याचा अंदाज करता येणार नाहीआषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस जी ही यात्रा भरते त्या एकादशीस देवशयनी एकादशी असेही म्हणतात.

मुख्य चार यात्रा(वाऱ्या) )-
चैत्री यात्रा : चैत्र महिना हा नवीन वर्षातील पहिला महिना आहे.पंढरपुरात चैत्र शुद्ध एकादशीस म्हणजेच कामदा एकादशीस यात्रा भरते.
(कार्तिकी यात्रा : कार्तिकी यात्रा ही कार्तिक महिन्यातीलशुद्ध एकादशीस पंढरपुरात साजरी केली जातेशयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत या दिवशी उठतातयाउत्सवात चंद्रभागेच्या वाळवंटात ठिकठिकाणी कीर्तनप्रवचन चालू असते.
३)माघी यात्रा : माघी यात्रा माघ महिन्यातील शुद्ध एकादशीस भरतेया एकादशीस जया एकादशी म्हणतात.ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन चालु असते.
आषाढी यात्रा : ज्ञानेश्वर महाराजांचा आजचा जो सोहळा आहे त्यांची सुरूवात मात्र दोनशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या हैबतबाबा आरफळकर यांनी केलीत्यांचा जन्म सरदार कुळात झाला होताते ग्वाल्हेरहून परत येत असताना चोरांनी गाठले  एका गुहेत कोंडलेतेथे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा धावा केलात्याच राजाच्या नायकास मुलगा झाला  आनंदाप्रीत्यर्थ त्यांनी हैबतबाबांना सोडले.ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने आपण सुटलोआता उर्वरित आयुष्य ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पण करूअसा निर्धार करून ते आळंदीला आले  तेथेच राहिलेआळंदीला माउलीच्या समाधीपुढे रात्रीच्या शेजारतीपासून सकाळच्या आरतीपर्यंत ते भजन करीतत्यांनी मनोभावे माउलींच्या सेवेत आपले आयुष्य घालविलेत्यांच्यापूर्वी माउलीच्या पादुका गळ्यात घालून पंढरपूरच्या वारीला येण्याची प्रथा होतीबाबांनी त्या पादुका पालखीत घालून दिंड्या काढून भजन करीत सोहळा नेण्याची परंपरा सुरू केली.आषाढी यात्रा ही पंढरीतील महायात्रा म्हणून ओळखली जातेआषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस ही यात्रा भरतेया एकादशीस देवशयनी एकादशी असेही म्हणतातभगवंत या एकादशीपासुन शयन करतातआषाढी एकादशीपासुन चातुर्मास चालु होतोचातुर्मासात अधिकाधिक विठ्ठल गुणांचे रुपाचे श्रवण कीर्तन करुन भक्त विठ्ठल प्राप्तीसाठी प्रयत्न करतातआषाढी कार्तिकीला श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन २४ तास चालु असतेसंत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कानाकोपर्यातुन पंढरीकडे श्रीविठ्ठल दर्शनासाठी येतातवाखरी येथील संतनगर येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र होतातआषाढ शुद्ध दशमीला सर्व पालख्या आणि दिंड्या एकमेकांना भेटतातइथुन आषाढ शुद्ध दशमीला सकाळी सर्व पालख्या हळुहळु पंढरीकडे जायला निघतातआषाढीला सारे वारकरी पवित्र चंद्रभागेत स्नान करुन संतांच्या पालख्यांसोबत पंढरी प्रदक्षिणा करतात.

साधारणतहा काळ वर्षाॠतूचा काळशेतकरी वर्ग शेतात पेरण्या करुन श्रीविठ्ठलदर्शनाची आस मनी घेऊन पंढरीत येतोचंद्रभागा नदी यात्रा काळात दुथडी भरुन वहात असतेआल्हाददायक वातावरण झालेले असतेवारकऱ्यांप्रमाणेच अनेक व्यापारी आपल्या मालाची विक्री करण्यासाठी दुकाने थाटून बसतातआषाढ शुध्द दशमीला अनेक संतांच्या पालख्यांचे पंढरपुरात आगमन होतेहजारो लोक पालखीला सामोरे जातातसाधु-संतांच्या आगमनाचा हा देवदुर्लभ सोहळा असतो''दिंडया पताका वैष्णव नाचती  पंढरीचा महिमा वर्णावा किती '' संत नामदेवाच्या या अभंगानुसार लाखो वारकरी 'माझे जीवीची आवडी  पंढरपुरा नेईन गुढी '' हा भाव अंतरी ठेवून खांद्यावर पताकामुखाने हरिनाम आणि टाळ-मुदुंगाच्या गजरात पंढरीत दाखल होतातयावेळी पंढरपुराला 'भूवैकुंठका म्हणतात याचा प्रत्यक्ष अनुभव येतो.
पंढरीचा पौराणिक महिमा -  वारकऱ्यांचे नव्हेतर अनेक वैष्णवसंप्रदायांचेकेवळ महाराष्ट्रीयांचेच नव्हे तर कर्नाटकआंध्रतमिळनाडूउत्तरप्रदेशमध्यप्रदेशादि अनेक प्रांतातील अनेक लोकांचेमराठी भाषिकांचेच नव्हे तर अनेकविध भाषिकांचे परमात्मा पंढरीनाथ हे आराध्य दैवत आहेअनेक संतानी या देवाचे माहात्म्य गाइलेले आहेस्वतपांडुरंगाने नामदेवरायांच्या जवळ आपले गुपित सांगतानाम्हटले आहे''आषाढी कार्तिकी विसरु नका मज  सांगतसे गूज पांडुरंग ''  
वारकरी संप्रदायाची ही अत्यंत महत्त्वाची यात्रा मानली जातेआषाढी यात्रेपासून ते कार्तिकी यात्रेपर्यंतचा चार महिन्यांचा काळ 'चातुर्मासम्हणून संबोधिला जातोया चातुर्मासात हजारो वारकरी पंढरपुरात मठमंदिरधर्मशाळेत राहून भजनकीर्तनादि कार्यक्रमात सहभागी होत असतातभागवत धर्माचा अभ्यास करतातया सर्वात मोठया यात्रेसाठी दरवर्षी संतांच्या पालख्यांसमवेत  अन्य मार्गाने सुमारे   ते  लाख लोक पंढरीत येत असतातपंढरीचा आसमंत 'ग्यानबा (ज्ञानोबातुकाराम','पुडलिक वरदा हरि विठ्ठलया नामघोषानेटाळ-मृदुंगाच्या नादघोषाने दुमदुमत असतो.

या यात्रेत पूर्वी ठरलेल्या मुहूर्तावर आळंदीदेहूपैठणशेगाव संत सत्पुरुषांच्या गावाहून त्या त्या संतांच्या पालख्या पंढरपुराकडे मार्गस्थ होतातएवढेच नव्हे तर भारताच्या विविध प्रांतांतून भिन्न भिन्न भाषा बोलणारेचालिरीतीचे श्रीविठ्ठलाच्या भक्तिप्रेमाने आपले भिन्नत्व विसरुन एकत्र येतात
उच्चनीचता,श्रीमंतगरीब,जातिभेद,भाषाभेद,प्रांतभेद विसरुन आपण सर्व एक श्रीविठ्ठलाचे वारकरी,'विष्णुदासआहोत ही भावना मनीमानसी दृढ धरुन येतातवारकरी संप्रदाय समताएकताअभेदता शिकविणारा आहेकारण त्याला माहीत आहे,
 ''उच्चनीच काही नेणे भगवंत  तिष्ठे भावभक्ती देखुनिया '' 
यामुळेच यात्रेत विषमता संपतेभेदभाव नाहीसा होतोपरदेशी अभ्यासू पर्यटकही हा सोहळा पाहण्यासाठी
 पंढरपूरास मोठ्या संख्येने येतात.
आषाढ शु ला भंडीशेगाव येथे रिंगण होऊन सर्वजण वाखरीयेथील संतनगरात मुक्कामास येतातदशमीच्या दिवशी सकल संतांच्या पालख्यांसमोर दिंडयांचे रिंगण होतेरिंगणसोहळा अत्यंत प्रेक्षणीय असतोसंतांचा अश्व वर्तुळाकार नाचत असतो,धावत असतो  त्यामागे वारकरी धावत असतातरिंगणसोहळा संपल्यावर सर्व पालख्या पंढरपूराकडे निघतात.
वाखरी येथून सर्व पालख्यांच्या शेवटी निघणारी पालखीश्री ज्ञानेश्वर महाराजांचीया पालखीचा प्रथम क्रमांक 
असतो.दुसरा क्रमांक देहूच्या श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पालखीचा असतोतिसरा क्रमांक पैठणच्या संत 
एकनाथ महाराजांच्या पालखीचाचौथी पालखी निवृत्तिनाथ महाराजांचीपाचवी सोपानदेवाचीसहावी 
एदलाबादहून आलेली संत मुक्ताबाईची पालखी आणि सातवी पालखी पंढरपुराहून संतांच्या पालख्यांना सामोरे जाऊन पंढरीस आणणारी श्रीनामदेवरायांची पालखीयाप्रमुख संतांच्या पालख्यांचे मार्ग ठरलेले असतातसंतनगर वाखरी येथील सर्व संतांच्या पालख्या एकत्रित येण्याच्या ठिकाणाहून आषाढ शुध्द दशमीला सकाळी 
१०  च्या सुमारास एकेक पालखी हळूहळू पंढरपूरकडे मार्गक्रमणा करु लागते.पंढरपुरात सर्वात शेवटी येणारी 
पालखी असते श्रीज्ञानेश्वरमहाराजांचीती रात्री १०-११ वाजण्याच्या सुमारास पंढरपुरातील प्रदक्षिणा रोडवरील श्रीज्ञानेश्वर मंदिरात येतेअन्य संतांच्या पालख्या आपापल्या मंदिरात जातातआषाढ शुध्द एकादशीला 
यात्रेकरु चंद्रभागेच्या पवित्र प्रवाहात स्नान करुन शुचिर्भूत होतातकपाळी गोपीचंदन  बुवक्याची नाममुद्रा 
लावतातगळयात तुळशीची माळ  टाळखांद्यावर पताका घेऊन हे वारकरी संतांच्या पालख्यांसमवेत 
नामघोष करीतक्षेत्र दक्षिणा करतातश्रीविठ्ठल मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होतेदर्शन बारीत १८-२० तास उभे राहून लोक 'श्री'चे दर्शन घेऊन कुतार्थ होतातवारी पूर्ण करतातदुपारी   च्या दरम्यान 
श्रीविठ्ठलाचा रथ क्षेत्र-प्रदक्षिणेसाठी निघतोमाहेश्वरी धर्मशाळेत (पूर्वीचा खाजगीवाले वाडाश्रीविठ्ठल-रुक्मिणी  राही यांच्या चांदीच्या मूर्ती आहेतया मूर्तीना सोन्याचे पाणी दिले आहेसजवलेल्या रथातून 
प्रदक्षणा मार्गावरुन रथारुढ श्रीविठ्ठलरुक्मिणी राहीच्या मूर्तीची मिरवणूक काढतातज्या भाविकांना एकादशीचे दिवशी मंदिरात जाऊन दर्शन येत नाहीत्या भाविकांना रथारुढ श्रीविठ्ठलाचे दर्शन होतेसमाधान मिळतेहा रथ भक्तभाविक ओढत असतातरथापुढे श्रीगजानन महाराज संस्थानचा हत्ती झुलत असतो. 'श्री'च्या दर्शनासाठी प्रदक्षिणामार्गावर लोकांची झुंबड उडतेलोक रथावर खारीकबुक्कालाह्यापैसे उधळतातठिकठिकाणी रथ थांबवतातपरंपरेनुसार मानकरी लोक 'श्री'ची पूजा करतात रथाची नगरप्रदक्षिणा पूर्ण झाली की वारी परिपूर्ण झाल्याचा वारकऱ्यांना संकेत मिळतो

बाराव्या तेराव्या शतकात या देवबाजीला उधाण आलं होतंयात भरडून निघालेल्या बहुजन समाजानं मग 
त्यांचा स्वत:चा साधा सोपा देव शोधलाजो रंगानं त्यांच्या सारखाच काळाशांतसात्वीक भावमुद्रेचाशस्त्रं 
टाकून कमरेवर हात ठेवलेलापूजाविधीचंभक्तीचं कुठलंही अवडंबर नसलेला देवपंढरीचा श्री विठ्ठल विटेवर स्थिर उभ्या राहिलेल्या या देवामुळं शेंदऱ्याहेंदऱ्या दैवतांचा बाजार कमी झाला या अहिंसावादीशाकाहारीदयाक्षमाशांती सांगणाऱ्या देवानं दीनदुबळ्यांना आधार दिलात्यांचं आत्मभान जागं केलंत्यांना आत्मविश्वासानं जगायला शिकवलंपिढ्यान पिढ्या सामाजिक स्थान नाकारलेल्या,दबलेल्यापिचलेल्या लोकांचा विठोबा आधार झालाभोळ्या भक्ताचं गुज जाणून घेणारा हा देव समाजाच्या सर्व थरांत मान्यता पावलात्याला असा चालता बोलता करण्याचं काम केलंत्याच्या लाडक्या भक्तानं भक्तानं,संतशिरोमणी नामदेवरायानंत्यानं या देवाची पताका महाराष्ट्रातच नाही तर दक्षिणे पासून उत्तरेपर्यंत संपूर्ण भारतभर फडकवली शेकडो वर्षे झालीकाळ बदललायंत्रातंत्राचं आधुनिक युग आलंपण आषाढी वारी सुरु आहेएका पिढीची जागा दुसरी पिढी घेतेदर आषाढीला वारीची वाट संतप्रेमानं उचंबळून येतेविठुनामाचा गजर टीपेला पोहोचतो...भल्या भल्यांना प्रश्न पडतोयाचं गुपीत काय आहेहे काही फार मोठं वगैरे गुपीत नाहीसमाजातल्या सर्व घटकांना आपल्यात सामावून घेतल्यानंच हा वारीचा ओघ आटला नाहीआटणार नाही हे त्यातलं उघडं सत्यजातपातधर्म,पंथगरीबश्रीमंतस्त्री पुरुष असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव वारकरी करत नाहीत.या वारकऱ्यांचा देवच मुळीसमताबंधुतासमन्वयाचं तत्त्वज्ञान रुजवणारा आहे.पंढरपुरात कटेवर कर ठेवून उभा राहिलेला विठोबा म्हणजे रोजचं जगणं सोपं करणाराबंधुभावानं जगायला शिकवणारा अनाथांचा नाथ आहेतो लोकांनी लोकांसाठी उभा केलेला लोकदेव आहेपंढरीच्या वारीत सारे वारकरी मोठ्या प्रेमाने एकत्र येतातपायवारी करताना एकमेकांना आपले अनुभव सांगतात,नवीन रचना अभंगभजनेओव्या म्हणून दाखवतात.आपल्या लाडक्या विठूरायाच्या , पंढरीरायाच्या म्हणजेच विठ्ठल भक्तीच्या प्रसाराच्या नवीन कल्पना सांगतातवारीत नव्याने आलेल्या नवख्यांना जुने , जाणकारअनुभवी वारकरी मार्गदर्शन करतातप्रत्येक जण या मेळाव्यात उपस्थित असल्याचे इतरांना समजावेयासाठी पताका बाळगत असेतोच प्रघात आजतागायत चालू आहे.

''पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडती जन एकमेका '' या संतवाणीप्रमाणे एकमेकाला वंदन करतातलहान -थोरउच्च-नीचभेद संपतोसर्व भाविकवैष्णव हा आनंद-सोहळा साजरा करुन, 'पंढरीची वारीपरिपूर्ण झाल्याच्या आनंदात आपापल्या गावाकडे मार्गस्थ होतात.

रवींद्र मालुसरे
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
9323117704


1 टिप्पणी:

  1. विठ्ठल रखुमाई व राही यांच्या चांदीच्या मूर्तीला सोन्याचा मुलामा दिलेला आहे यात ही राही कोण ?

    उत्तर द्याहटवा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...