पोस्ट्स

किल्ला लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सुभेदार तान्हाजी मालुसरेंच्या मुलुखातील इतिहासाच्या पाऊलखुणा

इमेज
  सुभेदार तान्हाजी मालुसरेंच्या मुलुखातील  इतिहासाच्या पाऊलखुणा  आज माघ वद्य नवमी.  नरवीर तान्हाजी मालुसरे यांची तिथीप्रमाणे पुण्यतिथी. तान्हाजीरावांची समाधी आणि भव्य पुतळा उमरठ येथे आहे. त्याठिकाणी नरवीर तान्हाजी-सूर्याजी मालुसरे यांचे वंशज आणि उमरठ येथील कळंबे परिवारासह पोलादपूर तालुक्यातील नागरिक-शिवप्रेमी १९३० पासून आजपर्यंत त्यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने साजरी करीत आले आहेत. पुरंदरच्या तहान्वये महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यापैकी २३ किल्ले मोगलांच्या ताब्यात गेले होते. शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील रयतेचे स्वराज्यावर काळे ढग दाटले होते. पुढे काय होणार असा प्रश्न सर्वांच्या मनात सलत होता. नजरेच्या टप्प्यात दिसणाऱ्या कोंढाणा किल्ल्यावर फडकणारा हिरवा ध्वज पाहून आई जिजाऊ अस्वस्थ होत होत्या, शिवाजी महाराजांना त्यांनी ही खंत बोलून दाखवली. आणि कोंढाण्याची मोहीम आखली गेली. सुभेदार नरवीर तान्हाजी-सूर्याजी मालुसरे यांनी महाराजांकडून ही मोहीम  आपल्या लेकाचे रायबाचे लग्न बाजूला ठेऊन हट्टाने मागून घेतली आणि घनघोर युद्ध करीत प्रसंगी रक्ताचा सडा शिंपत, स्वतःचे ...