बुधवार, ६ मे, २०२०

पोलादपूर अस्मिता




सन १९९८ मध्ये मी माझ्या सहकार्यांना सोबत घेत "पोलादपूर तालुका विशेषांक" प्रकाशित केला होता, सीताराम रेणुसे, सीतारामबुवा कळंबे, ज्ञानेश्वर मोरे, दिवंगत अशोक जंगम, सुनील मोरे-काटेतली (बडोदा), मुजुमले गुरुजी, प्रकाश कदम, ज्ञानोबा ला कळंबे यांनी विशेष मेहनत घेतल्याने हा अंक त्यावेळी प्रकाशित करू शकलो होतो.

आता तो अंक दुर्मिळ झाला आहे. अजूनही त्या अंकाबाबत विचारपूर होत असते.



या अंकात .......
पोलादपूरच्या सामाजिक-आर्थिक जीवनाचा इतिहास, चालीरीती व जाती जमाती, भौगोलिक परिस्थिती, ऐत्याहासिक स्थळे, तालुक्याचा सांस्कृतिक वारसा काल-आज-उद्या, तालुक्याची स्वयंपूर्णता, उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर उपाय, शैक्षणिक आढावा, तालुक्याच्या विकासाची दिशा आणि दशा, गोपीनाथभाई गांधी घराण्याची स्वातंत्र्य चळवळीतील तेजस्वी परंपरा, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने चार शब्द, पोलादपूरच्या ऐत्याहासिक वास्तू अस्मितेचा ठेवा,तालुक्यातील गडभ्रमंती, साद सह्याद्रीची भटकंती तालुक्यातील दऱ्याखोऱ्याची, इत्यादी वाचनीय आणि उपयुक्त माहिती छापली आहे. कोणाला हा अंक पाहिजे असल्यास ९३२३११७७०४ या व्हॅट्सऍपवर किंवा chalval1949@gmail.com या मेलवर नावासह मेसेज पाठवावा..... 

रवींद्र मालुसरे 
(अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...