पोस्ट्स

डिसेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ह भ प लक्ष्मणमहाराज खेडेकरांचे तीर्थाटन : आध्यात्मिक साधनेचा ऊर्जास्तोत्र

इमेज
ह भ प लक्ष्मणमहाराज खेडेकरांचे तीर्थाटन :  आध्यात्मिक साधनेचा ऊर्जास्तोत्र    महर्षी नारदांनी तीर्थाबद्दल आपल्या भक्तिसूत्रात असे म्हटले आहे की, तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि, सुकर्मी कुर्वन्ति कर्माणि सच्छात्री कुर्वन्ति शास्त्राणि ।। ना. भ. सू. ६९ ॥   अ से (अष्टसात्त्विक भावाने युक्त असणारे भक्त) तीर्थांना सुतीर्थ बनवितात, (विहित) कर्मानाही सुकर्म दशेला आणतात आणि शास्त्रांना सच्छास्त्र स्वरूप करून देतात. मनुष्याला संचित पापापासून मुक्त करून त्याला पावन करण्याचे सामर्थ्य हे तीर्थात, तीर्थक्षेत्रात असते. भारतात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. प्रत्येकाला एक इतिहास आहे. मनुष्याने जीवनात धार्मिक कृत्ये करावीत. तथापि, तीर्थयात्रेच्या निमित्ताने मनुष्यजीवनात निसर्गसान्निध्यात काही काळ घालवावा. तेथील देव- देवतांमुळे जन्म व दिव्य कर्मानी ही भूमी पुनीत झालेली असते तसेच; ऋषिमंडळी, संत, भक्त यांच्याही तप साधनेने ही भूमी पुनीत होत असल्यामुळे तेथे जाऊन आपले जीवन पुनीत करावे. यासाठी संत तुकाराममहाराज म्हणतात, जव हे सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाय ।।  तव तू आपुले स्वहित । ...

आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेच्या आंदोलनाला यश

इमेज
आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेच्या आंदोलनाला यश  आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेचे संस्थापक राज पार्टे, अध्यक्ष निलेश कोळसकर, कार्याध्यक्ष संजय उतेकर आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे💐 मनापासून अभिनंदन ! मागच्या दोन वर्षांपासून या संघटनेने जनसामान्यांना भेडसावणाऱ्या या प्रश्नावर संघटनेने हा प्रश्न धसास लावण्यासाठी सामोपचाराची आणि प्रसंगी आंदोलनाची त्याचबरोबर यापुढच्या काळात कार्यालयासमोर रेड्यांच्या झोंबी लावण्याची भूमिका घेतली होती.........  कालपासूनच जुने मीटर बदलून नवीन मीटर लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले आहे. प्रत्येक गावातील नादुरुस्त मिटर्स आहेत त्यांची यादी घेऊन वायरमन फिरत आहेत, स्थानिक गावकऱ्यांनी आपले नाव तपासून मीटर लगेच बदलून घ्यावे....विनायक चोरगे, रितेश डवळे, संजय पिंगळे हे कर्मचारी फोटोत काम करताना दिसत आहेत. 💪 बदलासाठी अद्दल घडवण्याची जोरदार परखड भूमिका घेतली की काय होऊ शकते. हे भूमिपुत्रांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.... 🚩लढवय्यांच्या भूमीत भूमिपुत्रांसाठी लढणाऱ्या नवतरुण कार्यकर्त्यांनो असेच जोमाने एकजुटीने कार्यरत रहा!.... ...

नामदार भरतशेठ गोगावले ....लोकनेता घडताना

इमेज
 नामदार भरतशेठ गोगावले ....लोकनेता घडताना  रोजगार हमी,फलोत्पादन खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद  मी .... भरतशेठ विठाबाई मारुती गोगावले ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित.....  रोजगार हमी,फलोत्पादन मंत्रिपदाची शपथ घेताना आमदार भरत गोगावले यांच्या तोंडून हे शब्द महाड -पोलादपूर-माणगावकरांनी ऐकले आणि एकच जल्लोष गावागावात वाडीवस्तीवर उसळला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षांपूर्वी सत्तातंर झाल्यानंतर आलेल्या मंत्रिमंडळात खरे तर भरतशेठ गोगावले यांचा सर्वाधिक हक्क होता. याचे कारण महाआघाडीचे सरकार जाण्यासाठी जे घडले होते त्यात आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार आणण्यात त्यांचा वाट महत्वाचा होता. त्याला रायगडमधील सत्ता संघर्षाबरोबर दुसरी आर्थिक बाजुही होती.  आघाडी सरकार स्थापन झाल्याबरोबर आदिती तटकरे पालकमंत्री झाल्याबरोबर अगोदर स्थानिक पातळीवर व नंतर राज्यपातळीवर ही अस्वस्थता पोहोचली होती. २० जुनला बंड झाले परंतु त्याअगोदर ६ महिने भविष्यात मंत्रिपद जवळ आलेय जरा धीर धरा असे सकारात्मकरित्या जवळच्या कार्यकर्त्यांना भरतशेठ ठामपणे हे सांगत होते. परंतु...

रुग्णांची संजीवनी : मंगेश चिवटे

इमेज
  रुग्णांची संजीवनी : मंगेश चिवटे  प्रार्थनेसाठी जोडणाऱ्या दोन हातापेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात चांगला असतो अशी निःस्वार्थ समाज सेवेची एक ओळख सांगितली जाते. सतत हसतमुख राहात जनतेच्या सुख दुःखात सहभागी होत रात्री-अपरात्री मदतीचा हात असाच नेहमी पुढे करणारा अवलिया म्हणून मंगेश चिवटे यांची ओळख महाराष्ट्राला गेल्या अडीच वर्षात झाली आहे. अगदी सोमवारी रात्री झालेल्या कुर्ला बस अपघातानंतरही मंगेश चिवटे तातडीने कामाला लागल्याचे दिसून आले होते. मंगेश चिवटे यांनी रुग्णालयात जाऊन कुर्ला अपघात प्रकरणातील जखमींची विचारपूस केली होती. महाड-चिपळूण - इरसाळ वाडी पूरग्रस्तांसाठी तातडीने धावून जाणे अशा अनेक प्रसंगामुळे मंगेश चिवटे यांनी स्वत:चेही एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  मंगेश चिवटे हे पूर्वाश्रमीचे पत्रकार आहेत. त्यांनी मुंबईत अनेक वृत्तवाहिन्यांसाठी वार्ताहार म्हणून काम केलं आहे. मुंबईत आल्यानंतर सुरुवातीच्या काळात चिवटे यांनी स्टार माझा, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, साम टी व्ही, आय बी एन लोकमत या वाहिन्यांमध्ये विविध पदांवर काम केले. सुमारे २०० हून अधिक नेत्यांच्या मुलाखती घेतल...

ऋतुजा राजेश मालुसरे यांना इंग्लंड येथे मास्टर्स पदवी प्रदान

इमेज
  ऋतुजा    राजेश    मालुसरे यांना इंग्लंड येथे मास्टर्स पदवी प्रदान     कु.ऋतुजा राजेश मालुसरे यांनी परदेशात उच्च शिक्षण घेत असताना इंग्लंड येथील न्यु कँसल युनिव्हर्सिटी - टेने अपॉन , ( इंग्लड)  UK  येथे   मास्टर्स इन अर्बन प्लॅनिंग अँन्ड डेव्हलपमेंट या विषयात मास्टर्स ही पदवी प्राप्त केली आहे.   युनिव्हर्सिटीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पदवीदान समारंभात  Prof. Dame Anne Johnson   यांनी पदवीपत्र सन्मानपूर्वक प्रदान केले. या विषयात असे यश मिळवणारी ऋतुजा पोलादपूर तालुक्यात प्रथमच असावी. याच युनिव्हर्सिटीत यापुढे ती असोसिएशट प्रोफेसर म्हणून रुजू होत आहे.   ऋतुजाचे शालेय शिक्षण हॉली क्रास हायस्कूल परेल मुंबई ,  प्राथमिक शिक्षण बारावी सायन्स महर्षि दयानंद कॉलेज परेल मुंबई तर पदवी शिक्षण    मनोहर फाळके आर्किटेक्ट कॉलेज मुंबई मुंबई विद्यापीठ   येथून घेतले आहे.   काल LIVE कार्यक्रम पाहिल्यानंतर ऋतुजाचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.   रवींद्र मालुसरे  अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई 9323...