कायद्याच्या रक्षणासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी कठोर व्हावे - रवींद्र मालुसरे

कायद्याच्या रक्षणासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी कठोर व्हावे - रवींद्र मालुसरे मुंबई : पोलिस वा 'खाकी वर्दी' म्हंटल की धाक, रुबाब, अशी एक संकल्पना सामान्य नागरिकांच्या डोळ्यासमोर उभी राहते. खाकी वर्दीतील तापटस्व भावाचा, कडक शब्दांत बोलणारा, हेकेखोर, असंवेदनशील व्यक्ती अशीच प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात असल्यामुळे अनेकजण पोलिसांपुढे जाण्यास घाबरतात. पोलिस अधिकाऱ्याला कर्त्यव्यासाठी वेळप्रसंगी थोडे कठोर व्हावे लागत असले, तरी वर्दीतही अगोदर तो मनुष्य असतो. त्यालाही मन, भावना असतात. माणुसकीच्या नात्याने प्रसंगी मदत करतात, सल्ला देतात, पण कायद्याचे रक्षण करण्यासाठी आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांना कठोर राहावं लागतं असे उदगार मराठी वृत्तपत्र लेखक संघांचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी काढले. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने दादर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस प्रमुख राजेंद्र आव्हाड साहेब यांचा मालुसरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार दत्ताराम घुगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर वैशाली रोडवेजचे मालक शिवाजीशेठ उगले, वर...