मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

।। नारायण नामे होऊ जीवन्मुक्त ।। https://youtu.be/xEOpbg0rnRw

।। नारायण नामे होऊ जीवन्मुक्त ।।

 https://youtu.be/xEOpbg0rnRw


'ताठ कणा' मूलमंत्र देणारा देवदूत म्हणजे डॉ. पी एस रामाणी - प्रमोद शिंदे

 'ताठ कणामूलमंत्र देणारा देवदूत म्हणजे डॉ. पी एस रामाणी - प्रमोद शिंदे


मुंबई (रवींद्र मालुसरे) : जगभरातली आई आपल्या प्रत्येक मुलाला लहानपणी हेच शिकवते कीआयुष्यभर ताठ कण्याने जगत रहा. डॉ. प्रेमानंद म्हणजे पी एस रामाणी यांच्या आईने सुद्धा त्यांच्यावर तसेच संस्कार केले. त्यामुळे कुणासमोरही वाकायचंझुकयाचं किंवा माघारही घ्यायची नाही हे अंगीकारल्याने जीवनातील प्रतिकूल परिस्थितीतही ते आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यूरो स्पायनल फ्लिप सर्जन म्हणून प्रसिद्ध होऊ शकले असे गौरवपूर्ण उदगार मन:शक्ती केंद्र लोणावळाचे प्रमुख विश्वस्त प्रमोद शिंदे यांनी दादर येथे काढले.

डॉ रामाणींच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व शिष्यांच्या वतीने त्यांना नुकताच 'गुरु द्रोणाचार्य पुरस्कार' प्रदान करून गौरविले होते. याचे औचित्य साधून शांता सिद्धि चॅरिटेबल ट्रस्टच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचा व प्रतिमा रामाणी यांचा विशेष सत्कार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रमोद शिंदे पुढे असेही म्हणाले कीमनशक्ती केंद्रात लहान मुलांना शिकवताना आम्ही विद्यार्थ्याची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी IQ,EQ,SQ हे शिवण्यावर अधिक भर देतो. IQ=Intelligent quotient म्हणजे बुध्यांक, EQ=Emotional quotient म्हणजे भावनिक बुध्दीमत्ता बुध्यांक. SQ=Social, spiritual quotient म्हणजे सामाजिकसात्विक बुध्दीमत्ता सत्विकांक म्हणजेच IQ EQ SQ ज्या विद्यार्थ्याकडे असेल तो जीवनात ताठ कण्याने उभा राहिल. डॉक्टरांनी असहाय रुग्णांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून जगण्याचे बळ तर दिलेच यापेक्षाही वैद्यकीय क्षेत्राला वरदान ठरणारा ते शोध लावू शकले त्यामुळे अनेकांना ते देवदूत वाटतात. 'ताठ कणाहे पुस्तक आणि चित्रपट अनेकांना प्रेरणादायी ठरो.
माणसामध्ये सत्वरजतम हे तीन गुण असतातचपरंतु सात्विक गुण स्वीकारून त्याने परोपकारी वृत्तीने जगायला शिकले व ते स्वतःत अंमलात आणले पाहिजेत. ही सवय लागली तर भगवद्गगीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे माणूस आपोआप कर्मयोग स्वीकारुन जगायला लागतोतेव्हा मोक्ष वैगरे कुठे नसतो तर तो आयुष्यात चांगले वागलो तर इथेच मिळतो. मनाला मिळणारा आनंद आणि समाधान म्हणजेच मोक्ष असे मत डॉ. रामाणी यांनी व्यक्त केले.
ज्या दिव्यांग अपंग व्यक्ती आणि मुले चालू शकत नाहीत अशा १७ जणांना शांता सिद्धि चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने व्हीलचेअर आणि वैद्यकीय वस्तूंचे विनामूल्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी 'ताठ कणाचित्रपटाचे निर्माते गिरीश मोहिते आणि पटकथा संवाद लेखक श्रीकांत बोजेवार यांनी या बायोपिकचे महत्त्व आपल्या मनोगतात सांगितले. सेक्रेटरी भूषण जाक यांनी ट्रस्टच्या सामाजिक कार्याचा आढावा आपल्या प्रास्ताविकात घेतला. सूत्रसंचालन निवेदिका स्मिता गवाणकर तर आभार प्रदर्शन डॉ तुषार रेगे यांनी केले. कार्यक्रमात 'ताठ कणाहा चित्रपट दाखविण्यात आला. खजिनदार संजय दिवाडकरकिशोर कुलकर्णीजयंत गायतोंडेविनायक पंडितसंजय कुलकर्णीसतिश दाभोळकरस्वप्नील पंडितदिपक देसाई यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...