रविवार, ८ जानेवारी, २०२३

पत्रकार आणि ममता दिनानिमित्त 'ज्येष्ठांच्या जीवन जाणिवा' या विषयावर मुक्तचर्चा

 

पत्रकार आणि ममता दिनानिमित्त
'
ज्येष्ठांच्या जीवन जाणिवा' या विषयावर मुक्तचर्चा

मुंबई (रवींद्र मालुसरे) :  घर आणि आपली माणसं सोडून व्यक्ती वृद्धनिवासात येते ही फार मोठी घटना असते. नाइलाजाने यावे लागणाऱ्यांची मन:स्थिती कठीण असतेच अशा वेळी त्यांच्या मानसिक स्थितीची जाणीव शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे आणि मिनाताई ठाकरे यांना असल्याने त्यांनी खोपोली सारख्या निसर्गरम्य वातावरणात प्रशस्त जागेत थ्री स्टारला साजेसा रमाधाम वृद्धाश्रम सुरु केला. वृद्धाश्रम म्हणजे डोक्यावर छप्पर त्याठिकाणी वृद्धांची अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार यांची सोय करणे त्यांना समाजात मानाने जगण्यासाठी प्रयत्न करण्याचा वसा त्यांच्या पश्च्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे रमाधामचे विश्वस्त अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी सामाजिक सेवेचे त्यांचे व्रत पुढे सुरु ठेवले आहे. समाजातल्या गरजूंनी या वृद्धाश्रमाला प्रत्यक्ष भेट देऊन या ठिकाणच्या सुखसोयी आणि व्यवस्था पाहून समाजातल्या गरजूना लाभ मिळवून द्यावा असे आवाहन शिवसेनानेते खासदार अनिल देसाई यांनी केले.

जानेवारी पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती आणि स्व मीनाताई बाळासाहेब ठाकरे स्मृती 'ममता दिनानिमित' खोपोली येथील रमाधाम वृद्धाश्रमात मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि शिवसेना लोकाधिकार महासमितीच्या वतीने 'ज्येष्ठांच्या जीवन जाणिवा' या विषयावर मुक्तचर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रमाधाम विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बदलत्या कौटुंबिक परिस्थितीचा वेध घेतांना वैद्य आपल्या भाषणात म्हणाले की, प्रत्येक मुलांनी सुनेने आपल्या आई वडिलांचा तसेच सासू सासऱ्यांचा संभाळ करावा. मात्र, बरीच मुले ही नोकरीसाठी देश - परदेशामध्ये जात असल्याने वृद्धाश्रमाची संख्या वाढतेच आहे.
समाजासाठी खरोखरच काहीतरी करावे अशी तळमळ असणारे शिवसेनाप्रमुख आणि माँ मिनाताई होत्या. ‘मार्केटची गरज म्हणून नव्हे तर जिव्हाळ्याच्या आत्मीयतेने ही वास्तू उभी राहिली आहे. वृद्ध हा घटक तसा गरीब आणि काही प्रमाणात असाहाय्य असतो याची जाणीव ठेवून इथे येऊ इच्छिणाऱ्या काही गरजवंत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक निकष लावता अत्यंत वाजवी दरात रमाधाम विश्वस्त मंडळ सहानुभूतीपूर्वक विचार करणार आहे त्यासाठी कोणाच्याही शिफारस पत्राची गरज नाही. त्यांनी 9820060132 या मोबाईल क्रमांकावर फोन करावा.


वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील आणि स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे श्री वामन भोसले यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. शिक्षणतज्ज्ञ कृष्णा ब्रीद, दादर सार्वजनिक वाचनालयाचे कार्याध्यक्ष मनोहर साळवी, राष्ट्रकूटचे कार्यकारी संपादक राजन देसाई, स्वा सावरकर अभ्यास मंडळाचे माजी प्रमुख कार्यवाह दिलीप सावंत, संघाचे माजी अध्यक्ष विजय ना कदम, ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत पाटणकर, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक श्रीनिवास डोंगरे, अनिरुद्ध नारकर यांनी मुक्तचर्चेत भाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष रमेश सांगळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वृत्तपत्र लेखक संघाचे अरुण खटावकर, सुनील कुवरे, प्रशांत भाटकर, सतीश भोसले, विवेक तवटे, दिलीप दळवी तर स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे उल्हास बिले, उमेश नाईक, शरद एक्के, बाळासाहेब सुदाम कांबळे, विलास जाधव, प्रवीण हाटे, राजन तांडेल, सुधाकर नर, तुकाराम गवळी आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी.

सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत  सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे ,  अठरावे शतक वैचारिकतेचे ,  एकोणीसावे शतक प्रगतीचे...