पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लक्ष्मण उतेकरांचा छावा इतिहास घडवणार

इमेज
लक्ष्मण उतेकरांचा छावा इतिहास घडवणार  अचाट धैर्य,अजोड पराक्रम,असामान्य शौर्य गाजवणारे रणधुरंदर,धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना मानाचा त्रिवार मुजरा !    फाड देंगे मुघल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरुरत की… हम शोर नही करते, सिधा शिकार करते है..! अग्नि भी वो,  पाणी भी वो,  तुफान भी वो,  शेर शिवरायांचा छावा है वो !  राजे छत्रपती शिवरायांचे रयतेचे हिंदवी स्वराज्यआणि राजाभिषेक ज्या भूमीत स्थापन झाले आणि नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या कर्तृत्ववाने रक्ताने लाल झालेल्या महाड - पोलादपूरच्या भूमीत जन्म झालेल्या लक्ष्मण उतेकर यांचा स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे यांच्या महापराक्रमाचा वेध घेणारा छावा हा चित्रपट येत आहे.   ज्या खोऱ्यातील मावळ्यांनी शिवरायांना प्रसंगी जीवाचे बलिदान देत साथ दिली त्या मावळ्यांचा वारसा लक्ष्मण उतेकर यांना लाभला आहे. उतेकरांच्या रक्तात 'शौर्य आणि निष्ठा' हा रक्तगट असल्यामुळे आणि इतिहासावर असलेल्या वेडापायी एव्हढे मोठे धाडस त्यांनी केले आहे. कॅमेरा अटेंडंट ते सुपरस्टार सिनेम...

अंबरनाथमध्ये सुवर्णामृतधारा

इमेज
  अंबरनाथमध्ये सुवर्णामृतधारा  इवलेसे रोप लावीयले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी  अंबरनाथची ओळख : केंद्र शासनाचा आयुध निर्माण कारखाना, विम्को, धरमसी मोरारजी, के.टी. स्टील आदी कारखान्यांमुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून एक औद्योगिक शहर अशी अंबरनाथची ओळख आहे. त्याचबरोबर अंबरनाथ म्हणजे मलंग गड, अंबरनाथ म्हणजे चिखलोली धरण. परंतु जागतिक पटलावर प्राचीन शिलाहारकालिन शिव मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाणारे अशीही अंबरनाथची ओळख आहे.  लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक अद्भूत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते. शिलाहार राज घराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात इ. स. १०६० मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या २१८ कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या, त्यांमध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे. उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील छित्तराज याने १०२२ ते ३५ या काळात हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला आणि इ. स. १०६०- ६१मध्ये छित्तराजा...

मराठी अभिजात भाषा चला ज्ञानभाषा करू या! उपक्रमाचा शुभारंभ मराठी भाषा प्रेमीना आवाहन

इमेज
महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक, दिवाळी अंक - मासिकांचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार, मराठी नाट्य-चित्रपट कलावंत, मराठी भाषा प्रेमी यांना आवाहन  मुंबई : अभिजात भाषेचा दर्जा मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे, पण हा मिळालेला दर्जा टिकविण्यासाठी प्रयत्न करणं त्याहून महत्त्वाचं ठरणार आहे. दोन हजार वर्षांहून अधिक काळाची समृद्ध साहित्यिक परंपरा असलेली मराठी भाषा आणि तिचे साहित्य आपल्या पुढच्या पिढींपर्यंत टिकवून ठेवणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी झालेली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला परंतु खऱ्या अर्थाने ती आज अभिजात राहिली आहे का ? यापुढे ती ज्ञानभाषा होण्यासाठी सर्व क्षेत्रातील मराठी भाषिकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केले आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन दादरमध्ये काशिनाथ धुरू हॉल ट्रस्ट आणि दादर सार्वजनिक वाचनालय आणि मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांच्या वतीने साजरा करण्यात आला याप्रसंगी मालुसरे बोलत होते. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या विषयावर चर्चा सविस्तर चर्चा करण्यात आली...