पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्यटनाला चालना देण्यासाठी महाड-पोलादपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसांचा विकास करणार - ना. भरतशेठ गोगावले

इमेज
पर्यटनाला चालना देण्यासाठी महाड-पोलादपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसांचा विकास करणार - ना. भरतशेठ गोगावले पोलादपूर (रवींद्र मालुसरे)  - रायगड जिल्ह्याला विशेषतः महाड आणि पोलादपूर तालुक्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या संपन्नतेचा वारसा लाभला आहे. प्रागैतिहासिक काळापासून मानवी संस्कृतीची जडण-घडण आपल्या जिल्ह्यात होत असल्याचे ठोस पुरावेदेखील अलिबाग, महाड सारख्या ठिकाणी उपलब्ध आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात तर या भूमीत जन्मलेल्या शूरवीर मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्याच्या स्थापनेसाठी मोलाची कामगिरी केली. नरवीर तान्हाजी मालुसरे, नरवीर सूर्याजी मालुसरे, नरवीर मुरारबाजी देशपांडे, परमानंदबाबा, रायगड किल्ला, कांगोरी किल्ला, चंद्रगड किल्ला वैगरे इतिहासाच्या अनेक  ऐत्याहासिक वारसाच्या खुणा अस्तित्वात आहेत. या वारशाची महती जगाला पटवून देण्यासाठी पर्यटनासारखा दुसरा पर्याय नाही. पर्यटन आणि ऐतिहासिक, सांस्कृतिक, नैसर्गिक, भौगोलिक स्थळांचा अतिशय नजीकचा संबंध येतो. कधीकाळी इतिहासाची सुवर्णपाने असलेली ही स्थळे जपण्याचा त्यांचे संवर्धन करण्याचा आटोकाट प्रयत्न मी करणार आहे. म...

नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या गावात ग्रामदैवत आई नवलाई-भैरी पुनः प्राणप्रतिष्ठा आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा

इमेज
नरवीर सूर्याजी मालुसरे यांच्या गावात ग्रामदैवत आई नवलाई-भैरी पुनः प्राणप्रतिष्ठा आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा सुभेदार नरवीर तान्हाजी आणि सूर्याजी मालुसरे यांच्या साखर गावाचे ग्रामदैवत आई नवलाई-भैरी यांची पुनः प्राणप्रतिष्ठा ( जीर्णोद्धार ) आणि पुनर्रचित मंदिराचा उदघाटन सोहळा दिनांक २४ व २५ एप्रिल २०२५ रोजी संपूर्ण दोन दिवस धार्मिक आणि पारंपरिक रितिरिवाज पूर्ण करून पोलादपूर तालुक्यात संपन्न होत असल्याचे अध्यक्ष विनायकदादा मालुसरे आणि संतोष महादेव मालुसरे यांनी पत्रकार परिषदेद्वारे सांगितले आहे. ग्रामदैवतांची उत्पत्ती भारताच्या प्राचीन धार्मिक, सांस्कृतिक, आणि सामाजिक परंपरांशी निगडित आहे. विशेषतः महाराष्ट्रातील कोकण आणि इतर ग्रामीण भागांमध्ये ग्रामदैवतांना फार पुरातन काळापासून महत्त्व आहे. ग्रामदैवतांचा उगम कसा झाला, याविषयी अनेक दंतकथा, लोककथा, आणि धार्मिक आख्यायिका आहेत. आमच्या साखर गावाबाबतही असेच म्हणावे लागेल. प्राचीन काळात नैसर्गिक संकटे, राक्षसी शक्ती आणि जंगलातील प्राण्यांपासून गावे सुरक्षित नव्हती. देवावर श्रद्धा ठेवणारी साधी - भोळी माणसं असलेल्या गावकऱ्यांना त्यांच्या ज...