*आचार्य अत्रे यांच्या स्मृतींना मुंबईत अभिवादन !*
*आचार्य अत्रे यांच्या स्मृतींना मुंबईत अभिवादन !*
सुभेदार वामन बांदल यांची शौर्याची वाटचाल प्रेरणादायी - बाजीराव मालुसरे
मुंबई : पोलादपूर तालुक्याला सुभेदार वामन बांदल यांचा अभिमान वाटावा अशी त्यांची भारतीय सैन्यातील त्यांची शौर्याची वाटचाल आहे. सैन्यात भरती झाल्यानंतर शिपाई, मग लान्स नाईक, त्यानंतर नाईक, हवालदार, नाईक सुभेदार, ते सुभेदार अश्या वेगवेगळ्या पोस्टवर प्रमोशन घेतल्यानंतर एन एस जी म्हणजे ब्लॅक कमांडो,त्यांच्या या उत्तम कामगिरीची दखल घेत त्यांची ज्युनिअर कमिशनड ऑफिसर अधिकारी या पदावर काम केल्यानंतर भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटरमध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून ते निवृत्त झाले.खरंतर प्रत्येक पोलादपूर वासीयांच्या हृदयात कोरली जायला हवी अशी ही कामगिरी आहे. असे उदगार सुभेदार नरवीर तानाजी-सूर्याजी मालुसरे यांचे वंशज आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाजीराव मालुसरे यांनी काढले.
कर्मे इशु भजावा
अभंग गायनाची खासियत अशी, की तो देवाच्या द्वारी उभा राहून गायला, तर त्यात रंग भरतोच, परंतु जिथे असू तिथे तल्लीन होऊन अभंग गायला, तर आपल्या सभोवतालचा परिसर गाभाऱ्यासारखा पवित्र होतो. समाधीस्थ अवस्था तयार होते आणि त्या आनंदात टाळ, चिपळ्या, मृदंगही नाचू लागतात. सगळे विठ्ठलमय होतात. तिथे रंक-राव असा भेदभाव उरतच नाही. कारण तो दरबार ईश्वराचा असतो. त्याचा कृपाप्रसाद सर्वांना सारखा मिळतो. सर्व विषयांशी संग सुटतो आणि केवळ विठुनामाचा संग जडतो. त्याचप्रमाणे विविध गुणांनी, विविध अभिव्यक्तीनी आणि वैविध्यपूर्ण स्वभावांनी बनलेली अनेकविध माणसं समाजात वावरत असतात. सारीच माणसं जिवंत असतात. पण ज्या माणसांत चैतन्य असते, कर्तृत्वाची स्फुल्लिंगं प्रज्वलित झालेली असतात, जीवनाचा अन्वयार्थ ज्यांना ज्ञात झालेला असतो अशीच माणसं जिवंत वाटतात आणि समाजातल्या अशा विखुरलेल्या चैतन्यमयी माणसांमुळे समाजपुरुष जिवंत साहे असे वाटते. अशी कर्तृत्ववान माणसं समाजाची भूषण असतात. इतकेच नव्हे तर अशी माणसं समाजाची कवचकुंडल असतात. असंच एक कवचकुंडल पोलादपूर तालुक्यातील लहुळसे गावात ८० वर्षांपूर्वी एका अज्ञानी, दरिद्री, विपन्नावस्थेत वावरणाऱ्या कुटुंबात जन्माला आले, जे पुढे संपूर्ण महाराष्ट्रात भजनानंदी हरिभाऊ रिंगे महाराज म्हणून समाजाला ललामभूत ठरले.
धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले जातात. त्यात पहिले तीन भौतिक उद्देश आहेत.. चौथा ज्ञानी. त्याला एका कामासाठी देवाने मर्त्यलोकी पाठविलेला असतो. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती' असे जगायचे कल्याण चिंतने आणि त्यासाठी देह कष्टविणे हे संतांच्या कर्तव्यापैकी एक आहे. हरिभाऊंनी आयुष्यभर आवडीच्या क्षेत्रात केलेले भव्यदिव्य काम पाहता ते एक व्यक्ती आहे असे मी मानत नाही, त्यांचं जीवन आता पारमार्थिक क्षेत्रातील एक विचार बनलेला आहे.
मनुष्याला त्याच्या जन्माला आल्यानंतर जेव्हा संतसंग किंवा सत्संग लाभतो तेव्हा त्याच्या पाठीमागे पूर्वपुण्याई, पूर्वजन्माचे संस्कार व सुकृत असते.रिंगेमहाराजांचा सहवास आपल्या सर्वाना लाभतो आहे हे आपले परम भाग्यच.
हाती घेतलेलं कोणतंही काम करताना त्यांचे केवळ कोरडं कर्तव्य नसतं, तर ते भावस्निग्ध व्रत असतं. ते काम सरस आणि सकस व्हावं, कार्यपूर्तीला सौजन्याचं कोंदण हवं याची त्यांना सतत जाणीव असते. आपले अनेक विद्यार्थी, सहकारी आणि स्नेही यांच्या भल्यासाठी ते जीवाचं रान करतात.
त्यांच्या प्रत्येक श्वासात प्रभुनाम स्मरणाची स्पंदने आहेत.पारमार्थिक तळमळ असणारे आणि अध्यात्मिक जीवन जगणारे असे हरिभाऊ रिंगे यांच्या वयाच्या ८० व्या वर्षपूर्ती निमित्त कृतज्ञता सोहळा संपन्न होत आहे. कर्मानेच ईश्वराची सेवा करावी लागते. सेवा करण्याला भजन म्हणतात. म्हणजे सर्व सुखासाठी 'कर्मे ईशु भजावा' हेच खरे. हरिभाऊ रिंगे महाराज यांचा जीवनपट नजरेसमोर आणला तर कर्माने ईश्वराला भजावे म्हणजे 'कर्मे ईशु भजावा' चा अर्थ अधिक स्पष्टपणे लक्षात येईल.
हरिभाऊंना माणसाची विलक्षण ओढ आहे. अनेक स्तरांतील आणि विविध व्यवसायातील माणसंविषयी त्यांना उत्कट प्रेम आहे. दोष कुणात नसतात ? दोष बाजूला ठेऊन माणूस शोधायचा असतो, असे अनेक उभे आडवे धागे जुळवीत समाज जीवनाचं वस्त्र ते विणत असतात. हरिभाऊ ८० वर्षानंतरची वाटचाल करीत असताना त्यांची उमेद पूर्वीसारखीच उदंड आहे. प्रतिकुलता झेलत आणि चैतन्य उधळत जगावं कसं याचा वस्तुपाठ म्हणजे हरिभाऊंचे जीवन आहे.
हरिभाऊंनी आयुष्यभर नाद ब्रम्हाचा अर्थ सांगितला व लेखाच्या विद्वान संगीत तज्ज्ञांपेक्षा काकणभर सरस असे भारतीय शास्त्रीय संगीतावर आपले चिंतन मांडले. विद्यादानासारखे श्रेष्ठ दान नाही. विद्यादान हे म्हणजे आत्मानंद देणारे ज्ञानदान होय. सतचित आनंद देणारे ज्ञान. यासाठी योग्य गुरु योग्य शिष्यासाठी जीवन जगतो आणि योग्यतेचा शिष्य भेटल्यावर अनेक कसोट्यांतून नेल्यावर नाते निर्माण होते. मानवधर्म मानणाऱ्या वारकरी संप्रदायाची विचारधारा जगाला मार्गदर्शक ठरेल, अशी हरिभाऊंची धारणा आहे. नभोमंडलात तळपणाऱ्या भास्काराप्रमाणे रिंगेमहाराज आपल्या शिष्यगणांसह अवघा महाराष्ट्र फिरत असतात. ऐसी कळवल्याची जाती करी लाभावीण प्रीती श्री तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे भाविक भक्तगणांना गेली ६० वर्षे दीपप्रकाशात रिंगे महाराज सन्मार्ग दाखवीत आहेत. कर्तव्यतत्पर माणसाला विश्रांती माहीत नसते. संगीत क्षेत्राची अफाट बौद्धिक ताकद असलेले कल्पक कलावंत जेव्हा एखाद्या समाजात निर्माण होतात तेव्हा त्या समाजाच्या परंपरेच्या दृष्टीने सांस्कृतिक आणि भौतिक पातळीवर काही नवे घडत असते. काळाच्या ओघात समाजात सतत स्थित्यंतरे घडत असतात. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वतःला झोकून देणारे आणि तन-मन-धन अर्पण करणारे निष्काम महापुरुष ठामपणे उभे राहातात तेव्हाच इतिहासात नोंद घेणारे बरेचसे त्यांच्याकडून घडत असते. पोलादपूरच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्र प्रांतात हरिभाऊंनी वारकरी गायन क्षेत्रात केलेले काम उल्लेखनीय असेच आहे.
वारकरी गायन क्षेत्रातील एक तपस्वी म्हणून त्यांनी हजारॊना जे ज्ञान दिले ते देताना त्यांच्या कर्मात निष्कामता होती. कर्मामध्ये निष्कामता येणे अत्यंत अवघड आहे. जो निष्कामतेने कर्म करतो त्यास 'कर्मयोगी' असे म्हणतात. कर्मामध्ये निष्कामता येण्यासाठी कर्माचे तत्व नीट समजले पाहिजे. जे करावयाचे आहे ते भगवंतासाठीच करावयाचे आहे असा भाव मनात निर्माण करावयाचा म्हणजेच निष्काम कर्म करावयाचे. सर्वव्यापी ईश्वर भावाने केलेले कर्म हे निष्काम कर्मच होते. यालाच दुसरे नाव 'भक्तिमार्ग' असे आहे. ती वाट परमात्म्याच्या पर्यंत पोहोचते व जीवास परमात्मरूप करते. हरिभाऊंनी ईश्वर भक्ती त्यांच्या विचारातून व आचारातून जाणवते कारण महाराज हे सच्चे वैष्णव आहेत. जीवन पराकोटीचं समर्पित केले की जीवन जीर्णशीर्ण होत नाही. सूर्याला म्हातारपण येत नाही. दर्या कधीच संकोचत नाही. चंद्र कधीच जुना होत नाही. विनाश कधीच त्यांच्याजवळ पोहोचत नाही. त्यांच्यात ना स्थित्यंतर ना कायापालट होतो.
भजनानंदी सुप्रसिद्ध भजन सम्राट ह भ प हरिभाऊ रिंगे महाराज हे ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्याबद्दल अंतःकरणपूर्वक शुभेच्छा ! यांनी हरिभाऊंनी मंगल जीवनाची, गौरवमय ऐंशी वर्षाची कारकीर्द पूर्ण केल्याचे निमित्त साधून त्यांच्या अभिष्टचिंतन करण्याची हि सुवर्णसंधी लाभली आहे, विश्वात्मक देवाच्या या महान भक्तास उत्कृष्ट, आरोग्य, दीर्घायुष्य, समाधान व शांती व सर्व भाविक भक्तांना एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे त्यांचे आध्यात्मिक मार्गदर्शन लाभून त्यांचे जीवन पुढील अनेक वर्षे कृतार्थ होवो हीच माउलींच्या चरणी प्रार्थना. माणूस किती वर्षे जगला यापेक्षा कसा जगला हे महत्वाचे आहे. 'कसा' हा शब्द संबंधित व्यक्तीची जीवनपद्धती, संस्कार व तिच्या जीवनविषयक ध्येयाचा निर्देशक असतो.
हरिभाऊ हे कुटुंबाचे, गावाचे, समाजाचे, वारकरी संप्रदायाचे उपकारकर्ते. आपल्यावर ज्यांनी उपकार केले, त्याची जाणीव मनात असून उपकार कर्त्याविषयी मनात सदैव सद्भावना असणे व त्याला अनुसरून उपकारकर्त्याशी वेळप्रसंगी तसे आपले वर्तन असणे ही झाली 'कृतज्ञता' या शब्दाची व्याख्या. आपल्या भारतीय संस्कृतीची जी अंगे उपांगे आहेत, त्यात कृतज्ञतेचा समावेश होतो. ....या चार शब्दांची ही शब्दसुमने त्यांच्या चरणी अर्पण !
-
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४
रायगड किल्ल्यावर ३४२ वा शिवपुण्यतिथी सोहळा
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या
वतीने रायगड किल्ल्यावर ३४२ वा शिवपुण्यतिथी सोहळा दि १५ व १६ एप्रिल २०२२ रोजी
आयोजित केला आहे. यावेळी भारत सरकारमधील केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ना
ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर आणि इतिहास संशोधक डॉ उदय कुलकर्णी यांना
अकरावा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार,
व्हाईस ऍडमिरल मुरलीधर पवार यांना
सैन्यदल अधिकारी सन्मान पुरस्कार तर सरदार घराण्यासाठी देण्यात येणारा सन्मान
पुरस्कार यंदा महाराष्ट्रातील ७० हून अधिक गावांत स्थायिक असलेल्या समस्त मालुसरे
परिवाराला देण्यात येणार असल्याची घोषणा सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे यांनी केली
आहे.
१२७ वर्षापूर्वी २५ एप्रिल १८९६ मध्ये लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत
झालेल्या पहिल्या उत्सवात त्यावेळी तानाजी मालुसरे व येसाजी कंक इत्यादींच्या
वंशजांस मानाचे नारळ देण्यात आल्याची नोंद त्यावेळच्या दैनिक केसरी आणि ऐतिहासिक
दप्तरात करण्यात आली आहे. असिम त्यागाच्या इतिहासाची परंपरा लाभलेला मालुसरे
परिवार पुन्हा एकदा या सुवर्ण क्षणाला सामोरा जात आहे.
रायगडवरील पहिल्या उत्सवाची कहाणी -
रायगड हा अखिल भारतातील एक दुर्भेद्य किल्ला ! १० मे १८१८ कर्नल प्रॉथरने नेतृत्वाखाली इंग्रजांनी रायगडचा ताबा घेतला, किल्ल्यावर एक घर व एक धान्याचे कोठार तेवढे इंग्रजांच्या अग्निवर्षावातून बचावले होते, शिवछत्रपतींचा राजवाडा पूर्णपणे उध्वस्त झाला होता, शिवछत्रपतींची समाधी सुद्धा भग्न झाली होती...पण प्रयासाने ओळखू येण्यासारखी होती, ही पडझड जितकी इंग्रजांच्या तोफखाण्यामुळे झाली होती तितकीच विखुरलेल्या मराठेशाहीमुळे सुद्धा झाली होती. सर्वत्र भग्न इमारतींचे अवशेष दिसत होते, गडावरील रस्ते, हारीने असलेल्या सुंदर इमारती, मंदिरे भग्न झाली होती, रायगडावरील दफ्तरखाना जळून खाक झाला होता. त्यानंतर रायगडचा उध्वस्त किल्ला जंगलखात्याच्या ताब्यात जाऊन तेथे वस्ती उरली नव्हती, रायगडचे राजकीय महत्व नष्ट झाले होते, पुढे १८८३ पर्यंत रायगडावर कोणी प्रवासी चढून गेल्याची नोंद नाही. इतके औदासिन्य लोकांत पसरले होते. पूढे मुंबईहून बोटीने नागोठणे आणि नंतर टांग्याने खडखडत लोक रायगडावर पोहोचत असत, पाचाडचा मुजावर सैद महम्मद किंवा वाडी येथील श्रीधर भगवान शेठ सोनार यांपैकी कोणीतरी गड दाखविण्याचे काम करीत. १८८५ मध्ये वर्तमानपत्रातून काही तुरळक उल्लेख येऊ लागले, १८८७ मध्ये गोविंद बाबाजी वरसईकर जोशी यांनी रायगड किल्ल्याचे वर्णन असे पुस्तक लिहिले, जोशी यांनी छत्रपतींच्या समाधीच्या जीर्णोद्धार सरकारी खर्चाने व्हावा असे लिहिले, यातूनच पुढे २५ एप्रिल १८९६ रायगडावर पहिला महोत्सव करण्यात आला, बारा मावळचे प्रतिनिधीसह महत्वाच्या जागी यावेळी माणसांची दाटी झाली होती, मेळ्याची पदे, विनायकशास्त्री अभ्यंकरांचे कीर्तन, शिवरामपंताचे भाषण, लोकमान्य टिळकांचे समारोपाचे भाषण, गंगाप्रसादाजवळ प्रसादाचे भोजन, छबिना इत्यादी कार्यक्रम व्यवस्थित झाल्यानंतर "तानाजी मालुसरे व येसाजी कंक इत्यादींच्या वंशजांस मानाचे नारळ देण्यात आले." इ.स. १८१८ पासून १८९६ पर्यंतच्या रायगडाच्या सुप्तावस्थेनंतरचा हा पहिला उत्सव होय....
या कार्यक्रमाचा हा पूर्ण इतिवृत्तांत त्यावेळी दैनिक केसरीमध्ये प्रकाशित झाला होता.
रवींद्र मालुसरे - अध्यक्ष
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
९३२३११७७०४
अभिनेत्री सीमा
देव चा इंग्रजीचा क्लास
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव गिरगावहून माहीमला राहायला आल्या होत्या तेव्हाची गोष्ट. चित्रपटात आहोत म्हणजे आपल्याला इंग्रजी बोलायला यायलाच पाहिजे या हेतूने त्यांनी शिकवणी लावायची ठरवली. एक ख्रिश्चन मुलगी त्यांना शिकवण्यासाठी आणि संभाषण करण्यासाठीचा सराव करून देण्यासाठी त्यांच्या घरी येऊ लागली. परंतु शूटिंगच्या व्यापामुळे त्यांना वेळ देता येत नसे. ती मुलगी दररोज येऊन जात असे . परंतु झाले मात्र असे सीमा देव याना इंग्रजीचा सराव देणे राहिले बाजूला ती मुलगीच छानपैकी मराठीचा सराव करून गेली.
झीनत अमानची 'मोलकरीण'
झीनत अमानला एकदा तिच्या घरी कपडे धुण्यासाठी एका मोलकरीणीची गरज होती. ही बातमी ऐकून एक जण तिच्याकडे आली. झीनतने तिची इंटरव्हियू घ्यायला सुरुवात केली. तिला प्रश्न विचारला, यापूर्वी तू कोठे नोकरी करत होतीस ?
ती म्हणाली ...राखी गुलजार कडे
झीनत म्हणाली,'मग ती नोकरी
सोडून माझ्याकडे नोकरी का करावीशी वाटतेय तुला ? राखीपेक्षा मी अधिक लोकप्रिय आहे म्हणून का ?
नाही मॅडम,
मग माझ्याकडे
नोकरी का मागायला आली आहेस
मला जेथे कामाचा
ताण कमी पडेल अशा नोकरीची गरज हवी आहे म्हणून. राखीबाईंच्या प्रमाणे तुम्ही अंगभर
कपडे काही घालत नाहीत. आणि राखीबाई अंगभर कपडे घालतात आणि बाहेर जाताना दिवसातून
तीन-चारदा सतत कपडे बदलतात. त्यामुळे त्यांच्याकडे धुण्याच्या कपड्यांचा ढीग पडतो.
तुम्ही तर पाच-सहा वेळा जरी कपडे बदललेत तरी तुमच्या तोकड्या कपड्यामुळे मोठा ढीग
पडणार नाही.
….हे ऐकून झीनतची काय अवस्था झाली असेल बरे.
नर्गिसजींचा 'स्विमिंग सूट'
नर्गिस यांच्यावर राज कपूर यांच्या 'आवरा' चित्रपटात स्विमिन्ग सूट घालून एक दृश्य द्यायचे होते. तेव्हा आता बंद करण्यात आलेला आर के स्टुडिओ तेव्हा उभा राहिलेला नव्हता. नर्गिसजींना चार भिंतीची मर्यादा सांभाळून हा सिन द्यायचा होता. यामुळे मास्तर भगवान दादांच्या ''आशा स्टुडिओत'' एक सेट लावून त्या सेटवर नर्गिसचे आवारातील तो स्विमिंगचा सीन चित्रित करायचे ठरले. त्यासाठी त्या सूटमधील तिचे दर्शन एकदम खुलेआम होणार नाही याची काळजी घेत राज कपूरने सर्व काळजी घेतली. त्यासाठी भगवानदादांचा स्टुडिओ त्यांनी खोदून खोदून स्टुडिओतच तलाव केला. आणि नर्गिस पडदानशिन अवस्थेतुनच डायरेक्ट त्या सूटमध्ये पडद्यावर आली.
मनोरुग्ण
परवीनच्या जीवनातील 'अर्थ'
काही चित्रपटात प्रेक्षक सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात. कागज के फुल या चित्रपटात गुरुदत्त-वहिदा-गीता दत्त यांच्यामधल्या नात्यांचा शोध घेतला, तसा ''अर्थ'' या महेश भट्ट यांच्या चित्रपटाबाबत घडले. या चित्रपटाची कथा महेश भट्ट यांच्याच जीवनातली. त्यांची पत्नी किरण आणि अभिनेत्री परवीन बाबी यांची. परंतु चित्रपटात महेशजींची भूमिका कुलभूषण खरवंदा यांनी त्यांच्या पत्नीची भूमिका शबाना आझमीने तर एक मनोरुग्ण नायिका स्मिता पाटीलने केली होती, अर्थ पडद्यावर आल्यानंतर स्मिताची व्यक्तिरेखा पाहून परवींन बाबीचा तोल ढळू लागला. त्यापूर्वीच तीच्याकडून काम करून घेणे अनेक निर्मात्यांना-दिग्दर्शकाना तिचा त्रास होऊ लागला होता. मात्र अर्थ प्रदर्शित झाल्यानंतर परिस्थिती अधिक बिघडली. यामुळे अनेकांनी तिच्याकडे पाठ फिरवली.चित्रपटाच्या दुनियेतून ती एकदम आउट झाली. आणि पुढे तर मनोरुग्ण होत या जगातून सुद्धा
४० वर्षानंतर SSC चा वर्ग भरला पुन्हा घंटा वाजली, धडे गिरवले
सामान्यांच्या व्यथा-वेदना टिपत सत्याची कास धरून पत्रकारिता करावी. सतरावे शतक प्रबोधनाचे , अठरावे शतक वैचारिकतेचे , एकोणीसावे शतक प्रगतीचे...